Friday, April 20, 2012

moving on

CHANGE IS THE ONLY CONSTANT THING IN THE WORLD.


बरोबर. नेहमीचं ऐकलं जातं हे वाक्य. पटतही. पण तरीही कुठलाही बदल स्वीकारणं तसं जरा अवघडच असतं, नाही का? बऱ्याचदा आश्चर्य वाटतं, इतकं का आपण आधीच्या गोष्टीत गुंतून पडलो आहोत? आपण आपल्या भावना गुंतवल्या असतात की तो नुसताच सवयीचा परिणाम असतो? की नवीन गोष्ट स्वीकारण्यातला आळस? की नवीन गोष्टीच्या अनभिज्ञतेतून नकळत निर्माण झालेली भीती? सतत काहीतरी हातातून निसटतंय याची नकळत बोच लागून राहते. हुरहूर असते की हे निसटतं आपल्याला कायम घट्ट नाही पकडून ठेवता येणार. पण एकीकडे हेही कळत असतं की काही गोष्टी हातातून जात आहेत हे खरं, पण काहीतरी नवीन नक्कीच आपल्या वाट्याला येईल जे चांगलंच असेल. आशा किती चिवट असते! 

बदलाला सामोरं जाताना मात्र खरंच गंमत येते.

अगदी सुरुवातीला अक्षरशः जाणवतं, आपलं मन हर प्रकारे -आताची स्थिती किती चांगली- बदल कसा वाईट, याची हजार कारणं शोधतं. पावला पावलावर पुरावे देत रहातं. तुलना करत राहतं. हळूहळू दुसरं मन पुढे येऊ लागतं. म्हणतं, आताची गोष्ट चांगली हे मान्य. पण नव्याने सामोरी येणारी गोष्ट ही वाटतं तितकी वाईट नाहीच. होईल की सवय. न जाणो तेव्हा अशा काही गोष्टी मिळतील की ज्याचा आधी स्वप्नातही विचार केलेला नव्हता. या दोन मनातली द्वंद्व आपण तिसऱ्याच तटस्थ भूमिकेतून पाहत राहतो. हळूहळू दुसऱ्या मनाची सरशी होतेय हे जाणवतं. हे तसं होणंच चांगलं अर्थातच. आपल्याच नकळत पहिलं मन दुसऱ्या मनाची कड घेऊ लागतं. द्वंद्व कमी कमी होऊ लागतं.
आणि मग आपल्यालाच एक दिवस कळतं, अरेच्चा नाही म्हणता म्हणता आपण बदल स्वीकारला. आपण बदललो.. आपल्याच नकळत....


6 comments:

  1. मनातल्या लहरी अचूकपणे आणि सहज शब्दांत टिपण्याचं काम अगदी मस्त केलंयस....
    Hats off to you!

    ReplyDelete
  2. आपल्या नकळत सहज बदलत जाणारी गोष्ट म्हणजे आपण "स्वत:च .."
    कळूनही येत नाही कधी आणि कसे बदललो ते..
    जो पर्यंत दुसरा कुणी त्याची जाणीव करून देत नाही तोपर्यंत आणि स्वत:ची स्वत:ला जाणीव व्हायला आत्मपरीक्षण करायची गरज असते जे करायला आपल्याला जवळ वेळ नसतो..
    इतर व्यक्ती आणि परिस्थितीपेक्षा आपण स्वत:लाच जास्त गृहीत धरतो...
    तुझ्या पोस्ट ने विचार करायला लावला.. मीही नक्कीच बदललोय.. आणि विचार करू लागलोय "मी किती बदललोय याचा?"

    ReplyDelete
  3. Vachatana patatay sagal manala. Uttam lihil ahes.

    ReplyDelete
  4. स्थिती प्रिंयता फार कॉमन आहें , अगदी अभ्यास करताना एखादं पुस्तक लांब असेल तर उठून घेण्याचा कंटाळा येणे , किंवा हल्ली जास्त वेळा होणारी गोष्ट म्हणजे online शॉपिंग करावंसं वाटतंय पण, क्रेडिट कार्ड घ्यायला उठायचा कंटाळा . या रोजच होणाऱ्या गोष्टी . पण, खरंच बदल: कामातला , शिक्षणातला , गावातला , anxiety provoking च जास्त असतो. तु म्हटल्याप्रमाणे मग हळू हळू सवय होत जाते : नव्या जागेची, कल्पनांची, जगाची .

    ReplyDelete