Friday, November 23, 2012

तरकश

बऱ्याच दिवसांपासून स्वतःशीच स्वतःची तक्रार होती की काहीच वाचन होत नाहीये. वाटत होतं, कुठे गेले ते दिवस जेव्हा एखादं पुस्तक हातात पडायचा अवकाश, ते संपवल्याशिवाय चैन पडत नसे. एक रितेपणाची भावना पण उगाचच मनात दाटून येते अशावेळी. गेल्या आठवड्यात एक पुस्तक हातात पडलं आणि हे सगळे विचार कुठल्या कुठे पळून गेले.

जावेद अख्तर यांचा कवितासंग्रह- तरकश. उर्दू-हिंदी या मूळ भाषेतल हे पुस्तक कितीतरी इतर भाषांमध्ये अनुवादित झालय. अगदी मराठीत सुध्दा! इतर भाषांतल्या अनुवादाचं माहित नाही, पण मूळ भाषेचा गोडवा वेड लावणारा आहे हे नक्की.

कुठल्याही कलाकाराच्या कलेच्या सादरीकरणामध्ये त्याच्या स्वतःच्या आयुष्यातल्या अनुभवांचा खूप मोठा पगडा असतो असं मला नेहमीच वाटत आलंय. एका प्रख्यात गायिकेने तिच्या एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की ज्या व्यक्तीच्या वाट्याला दुःख आलं नाहीये अशी व्यक्ती मोठा कलाकार होऊच शकत नाही. पुस्तकाच्या सुरुवातीलाच जावेद 'अपने बारे में' असं म्हणून आपल्या आयुष्याची छोटीशी झलक देतात. अतिशय सहज साध्या सोप्या भाषेत समोरच्या व्यक्तीशी संवाद साधण्याच्या सुरात लिहिलेले आत्मकथन एक वेगळाच अनुभव देऊन जाते.प्रसिद्धीच्या वलयात वावरणाऱ्या या व्यक्तीच आयुष्य किती वेगळ्या अनुभवांतून गेलंय! सुरुवातीच्या या आत्मकथनामुळे संग्रहातली कुठलीही कविता वाचताना जावेद अक्षरशः उलगडत जातात, जणूकाही एखाद्याच्या मनापुढे आरसा ठेवला असता आपण त्या व्यक्तीच्या मनातलं लख्खपणे वाचू शकू असं...

'तरकश' म्हणजे 'Quiver'- बाणांचा भाता. या संग्रहातल्या बहुतेक कविता, गझल, शेर हे खरोखर या संग्रहाच नावं सार्थ करणारे आहेत. सगळ्याच कलाकृती भावातीलच असं नाही, पण जे भावतं ते मनात घुसून घर करून राहण्यासारखं आहे.

मला आवडलेल्या सगळ्या गोष्टी इथे लिहिणं शक्य नाहीये. पण तरीही काही उल्लेख केल्याशिवाय रहावत नाही.

***
ऊँची इमारतों से मकां मेरा घिर गया
कुछ लोग मेरे हिस्से का सूरज भी खा गए


***

जुन्या  घराच्या आठवणींबद्दल लिहिलेली 'वो कमरा याद आता है' ही अशीच एक अप्रतिम कविता.
या कवितेच्या शेवटी ते म्हणतात,

मैं अब जिस घर में रहता हूँ
बहुत  ही खूबसूरत है
मगर अकसर यहाँ ख़ामोश बैठा याद करता हूँ
वो कमरा बात करता था

**
संघर्षाच्या काळामध्ये जेव्हा हातातोंडाची गाठ पडायची मुश्कील होती या दिवसांबद्दल लिहिताना ते म्हणतात-
रोटी एक चाँद है और हालात बादल.. चाँद कभी छुप जाता है, कभी दिखाई देता है


'भूख' ही कविता अशीच अक्षरशः काटा आणणारी आहे.

**

'एक मोहरे का सफर' , 'वक्त' आणि अशा अनामिक कितीतरी. उल्लेख करावा तितका कमीच आहे.

ही पण मला भावलेली अशीच एक अनामिक गझल.

या पूर्ण कवितासंग्रहाच स्वतः जावेद अख्तर यांच्या आवाजातलं अभिवाचन you-tube वर  available
आहे. परंतु पुस्तकाच्या मानाने अभिवाचन जरा एकसुरी वाटलं. माझ्या मते, पुस्तक वाचताना जास्त मजा येते. निदान मला तरी पुस्तक जास्त आवडलं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कठीण शब्दांचे अर्थ शक्य तिथे दिले आहेत या पुस्तकात! मिळालं तर नक्की वाचा!

Wednesday, August 22, 2012

काही बोलायाचे आहे..

जगण्याचा संघर्ष हा तसा नेहमीचाच. सगळ्यांच्याच वाट्याचा. चुकत कोणालाच नाही. पण आजच्या तथाकथित पुढारलेल्या जगात अजूनही स्त्रियांना जेव्हा विचित्र वागणूक, विचित्र नजरा सहन कराव्या लागतात तेव्हा खरोखर काहीच उमगेनास होतं. आपण फक्त बाहेरुन बदललोय.. मानसिक वृत्ती काही सुधारायच्या बेतात दिसत नाही. कदाचित कधीच नाही बदलणार. एक उपभोग्य वस्तू यापलीकडे काहीतरी अस्तित्त्वाला अर्थ यावा असं वाटणं यात काय गैर आहे? व्यक्तीस्वातंत्र्य ही फक्त बोलाचीच कढी असल्यासारखं वाटत राहतं. अजूनही so called metropolitan शहरात सुशिक्षित (!) लोक आजूबाजूला असतानाही एक स्त्री म्हणून मुक्तपणे, स्वतंत्रपणे, निर्भयतेने जगता येत नाही हेच खरं. काही दिवसांपूर्वी गुवाहाटी मध्ये घडलेल्या ओंगळवाण्या प्रवृत्तीचे विकृत दर्शन घडवणाऱ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर एक पोस्टर पाहण्यात आलं होतं.

हा सोनियाचा दिन कधी उगवणार आहे काय?

Friday, July 13, 2012

Friday evenings are always beautiful. Seriously!! Not even Saturday or Sunday. (Umm, well, Saturday is still fine cause there is one more day left for weekend to get over). At least past 1-2 months I am experiencing that a lot. Prior to that; leave apart one day, every evening used to be beautiful. Perhaps this is a part of the lifestyle I am trying to adapt to. Now it has come down to only one day.

Believe it or not, friday eves are somewhat specially soothing. It cannot be explained, I could just experience it. It gives immense pleasure to shut the system I am working on...on friday 6. P.M. Not that I hate my work, but just the feeling of welcoming long weekend which is at few hours away creates bubbles of joy in the heart. The cold breeze that touches your face while your cab is taking you home gives soothing feeling ( I agree that the streets are crowded, the air is polluted and blah blah.. but still :) ).. just taking a deep breath cheers me; even a faint line of smile appears on my face..yeah yeah I actually realize that I am smiling for no reason..

BUT, there are days like today, when somebody pops in for some work at 5.30 PM and indicates that you still have to spend couple of hours extra in the office, gives the pain. While watching everybody leaving wishing each other happy weekend, you sit at your desk to get your work done. The shutters of the windows are down- you do not know how beautifully the light has spread after the Sun has set or whether it is raining outside. You console yourself that even though plans for friday evening will not work out, there are two more days in your bag..

I end up writing this blog post after several days on an evening like this, at least the feeling that I am ignoring my blog for really long time is somewhat changed!! The evening is not completely spoiled :-)

Friday, April 20, 2012

moving on

CHANGE IS THE ONLY CONSTANT THING IN THE WORLD.


बरोबर. नेहमीचं ऐकलं जातं हे वाक्य. पटतही. पण तरीही कुठलाही बदल स्वीकारणं तसं जरा अवघडच असतं, नाही का? बऱ्याचदा आश्चर्य वाटतं, इतकं का आपण आधीच्या गोष्टीत गुंतून पडलो आहोत? आपण आपल्या भावना गुंतवल्या असतात की तो नुसताच सवयीचा परिणाम असतो? की नवीन गोष्ट स्वीकारण्यातला आळस? की नवीन गोष्टीच्या अनभिज्ञतेतून नकळत निर्माण झालेली भीती? सतत काहीतरी हातातून निसटतंय याची नकळत बोच लागून राहते. हुरहूर असते की हे निसटतं आपल्याला कायम घट्ट नाही पकडून ठेवता येणार. पण एकीकडे हेही कळत असतं की काही गोष्टी हातातून जात आहेत हे खरं, पण काहीतरी नवीन नक्कीच आपल्या वाट्याला येईल जे चांगलंच असेल. आशा किती चिवट असते! 

बदलाला सामोरं जाताना मात्र खरंच गंमत येते.

अगदी सुरुवातीला अक्षरशः जाणवतं, आपलं मन हर प्रकारे -आताची स्थिती किती चांगली- बदल कसा वाईट, याची हजार कारणं शोधतं. पावला पावलावर पुरावे देत रहातं. तुलना करत राहतं. हळूहळू दुसरं मन पुढे येऊ लागतं. म्हणतं, आताची गोष्ट चांगली हे मान्य. पण नव्याने सामोरी येणारी गोष्ट ही वाटतं तितकी वाईट नाहीच. होईल की सवय. न जाणो तेव्हा अशा काही गोष्टी मिळतील की ज्याचा आधी स्वप्नातही विचार केलेला नव्हता. या दोन मनातली द्वंद्व आपण तिसऱ्याच तटस्थ भूमिकेतून पाहत राहतो. हळूहळू दुसऱ्या मनाची सरशी होतेय हे जाणवतं. हे तसं होणंच चांगलं अर्थातच. आपल्याच नकळत पहिलं मन दुसऱ्या मनाची कड घेऊ लागतं. द्वंद्व कमी कमी होऊ लागतं.
आणि मग आपल्यालाच एक दिवस कळतं, अरेच्चा नाही म्हणता म्हणता आपण बदल स्वीकारला. आपण बदललो.. आपल्याच नकळत....


Tuesday, February 21, 2012

असं म्हणतात की कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं. आपण जसं पाहतो, जे पाहतो त्यात आपल्या मनाचं प्रतिबिंब उमटलेलं असतं. आपलं आनंदी असणं, दुःखी असणं हे आपल्या आजूबाजूच्या वातावरणात प्रतिबिंबित होत असतं. तर कधीकधी आजूबाजूच्या वातावरणाने आपला मन प्रसन्न होतं. आपला मूड आणि आजूबाजूचं वातावरण याच्यापैकी कुणाचा कुणावर जास्त प्रभाव पडतो, हे अधोरेखित करणं खरोखर अवघड आहे. किंबहुना यातली सीमारेषा अतिशय धूसर आहे.


काही लोकाना प्रत्येक गोष्टीत काहीतरी खोच काढायची सवय असते, तर काहीना अगदी वाईटातूनही चांगला काहीतरी शोधता येतं. अशा लोकांच्या संपर्कात येणारी व्यक्तीही आपोआप प्रसन्न होऊन जाते.


ज्यांच्यावर सरस्वतीचा वरदहस्त आहे अशी माणसं जगात आहेतच. पण प्रत्येक माणसाचं व्यक्त होणं ते खूप वेगवेगळं असतं. काहींना सहज सोप्या भाषेत म्हणणं मांडण्याची कला अवगत असते, तर काहींना अतिशय जड शब्द, अवघड शब्द नेमकेपणाने वापरता येतात. ( ग्रेसांची कविता हे याचं उत्तम उदाहरण आहे.. माझ्यासारख्या व्यक्तीला अनेकदा वाचून त्यातलं अवाक्षरही झेपत नाही ही गोष्ट वेगळी! मी आपली लोक म्हणतात ते खरच ग्रेट आहेत तर बुवा आहेत या चालीवर म्हणतेय!)
साधी सोपी मांडणी मात्र मनाला लगेच भावून जाते. व. पु. कुठे तरी म्हणून गेले आहेत, की लिखाण कसं असावं; तर जे वाचल्यावर, अरेच्चा! हे आपल्याला का नाही सुचलं बुवा, असं वाटायला लावणारं कुठलंही लिखाण.

आणि अशा सहज शब्दात जर आपल्या आयुष्याचा महोत्सव जर कुणी मांडून ठेवला, तर??


प्रति एक झाडा, माडा त्याची त्याची रूपकळा
प्रति एक पाना, फुला त्याचा त्याचा तोंडावळा

असो पाखरू, मासोळी, जीव, जीवार, मुंगळी
प्रत्येकाची तेवठेव काही आगळीवेगळी

असो ढग, असो नग, त्याची अद्रुत रेखणी
जी जी उगवे चांदणी तिच्या परीने देखणी

उठे फुटे जी जी लाट तिचा अपूर्वच थाट
फुटे मिटे जी जी वाट तिचा अद्वितीय घाट

भेटे जे जे त्यात भरे अशी लावण्याची जत्रा
भाग्य केवढे! अपुली चाले यातूनच यात्रा   


आपल्या आजूबाजूचं विश्व सहज शब्दात मांडणारे शब्द! कवी बा भ बोरकर यांनी लिहिलेली ही एक कविता. कुठली व्यक्ती जगाकडे कशी बघत असेल बरं असा प्रश्न पडता पडताच असं काही वाचण्यात येतं.
वाचल्यानंतर आपोआपच हा सोहळा आपणही अनुभवू लागतो.

Hats off to Borkar!!
(Thanks AM for sharing this :-))

Wednesday, February 8, 2012

किंमत

नवीन वर्षातला एक महिना बघता बघता उलटून गेला. दुसऱ्या महिन्याचा दुसरा आठवडाही सुरु झाला.
म्हटलं तर बराच काळ म्हटलं तर एक-दीड तर महिना. काळाची गती इतकी तुफान आहे की जणूकाही पापण्या लवायच्या आत दुनिया प्रचंड बदलेल इतकी प्रचंड गती जाणवते कधीकधी. होत्याचं नव्हतं व्हायला तसं म्हटलं तर एक क्षणही पुरेसा असतो. मग एक आठवडा काय चीज आहे!



माणसं हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग. आपल्या आजूबाजूला असतातच सदैव. त्यात काय? पण त्याचं महत्त्व, त्यांच्या अस्तित्वाचा तुमच्या आयुष्याशी जोडलेला धागा कुठलीतरी परिस्थिती आल्यावर प्रखरपणे जाणवून देण्याची सोय निसर्ग आपोआपच करीत असतो. तुमच्या ध्यानीमनी नसताना तुमच्यावर सदैव कुणावरतरी विसंबून राहण्याची वेळ येते. आपल्या आजूबाजूचे लोक आपल्यासाठी चोवीस तास कुठल्या न कुठल्या प्रकारे त्यांची स्वतःची कामे बाजूला सारून धावत पळत असतात.  तेही विनातक्रार. चेहऱ्यावरती कसलाही थकवा जाणवू न देता. घरापासून आपण हजार किलोमीटर लांब असलो तरीही निश्चिंत आहोत. ही भावना केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे मनात असते. रक्ताची नाती तर असतातच, पण मनाची नाती बांधली गेली तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात आपण असलो तरी एकटे नाहीयोत ही भावना खूप सुखावून जाते.

गेल्या महिन्यातलं माझं आजारपण या सगळ्या लोकांची किंमत मला शिकवून गेलं.  या सगळ्यांसाठी धन्यवाद हा शब्द खूप वरवरचा, त्रोटक आणि कोरडा वाटतो. 'Thank you' हा शब्द आजकाल इतक्या सर्रासपणे रोजच्या वापरत असतो की आताशा त्यातला खरा रस निघून गेल्यासारखाच वाटतोय. असो. इतकंच म्हणेन की सगळ्यांनी माझ्यासाठी जे केलं त्याचा विसर मला कधीच न पडो.




आपण आपल्या शरीराला तसं नेहमीच गृहीत धरत असतो. कधी कल्पना नाही करवत की एखादा अवयव जर निकामी झाला तर किती अडचणींचा सामना करावा लागेल. इतकं कशाला, साध्या आपल्या हाताच्या एका म्हटलं तर क्षुल्लक, अशा शिरेने जर असहकार पुकारला तर किती वाट लागू शकते याचाही प्रत्यय मला नुकताच आला. सलाईन दिल्यानंतर जेव्हा ती शीर सुजली आणि हात हलवताना नाकी नऊ येऊ लागले तेव्हा जो झटका बसला तो बसला.किंमत कळते ती अशीही.



आपण बऱ्याचदा इतक्या वेगळ्या विश्वात वावरत असतो की मृत्यू हे अंतिम सत्य आहे वगैरे वगैरे तत्वज्ञान खरं आहे हेच विसरायला होतं. जाणवतही नाही की आज आपण ज्या व्यक्तीशी बोलतोय, हसतोय, गप्पा मारतोय तो कदाचित् काही दिवसांतच या जगातून जाणार आहे. जाणवेल तरी का? आणि कशाला? पण तरीही चुटपुट लागून राहते. बातमी ऐकल्यावर विश्वास बसत नाही. हीच का ती व्यक्ती? गेल्याच तर रविवारी
आपण भेटलेलो. गप्पा मारल्या. कितीतरी गोष्टी ठरवल्या. आणि आज ऐकतोय की ती या जगातून गेली! अचानकच! संपले म्हणे तिचे या जगात घ्यायचे श्वास. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जन्माला येतानाच हे ठरलेल असतं. काहीही. पण वाट्टेल तेव्हढा त्रागा करा, चीडचीड करा, रागराग करा.. शेवटी आपल्या हातात काहीच नाही. भांडायचं तरी कुणाशी? देव अस्तित्त्वात आहे का नक्की ? जाऊन भांडता तरी येइल! ही काय पद्धत आहे का माणसाला उचलायची? जाऊ देत. आपण जाऊच द्यायचं. आणखी करणार तरी काय म्हणा.
व्यक्ती गेली की मग एक एक गोष्ट आठवत राहते. अरेच्चा हे तर सांगायचच राहून गेलं, पुन्हा एकदा मुदुमलाईला बोलवायचं राहून गेलं. कसले प्लान्स आणि काय.
LIFE IS SOMETHING THAT HAPPENS TO YOU WHILE YOU ARE BUSY MAKING OTHER PLANS. हेच खरं.
असेही झटके मिळतात. किंमत कळते ती अशीसुद्धा!




नवीन नाती सतत जोडली जात राहतात. आपण खुशीत असतो की वाह, क्या बात है! आपण किती भाग्यवान आहोत. आपल्याबरोबर आपली इतकी माणसं आहेत. भाग्यवान असतो आपण हे नक्की. पण ते भाग्य कदाचित आधीच्या माणसांच्या दुरावण्याशी जोडलेलं असतं कदाचित.


Sunday, January 8, 2012

Life… or something like that!

Is your life heading the correct way you wanted it to? Are you sure about the correctness of whatever decisions you made at any point of time?
 -But how do you even decide before actually trying out?  What are the odds of other choice of leading life/career or whatever being correct? Wouldn’t you have felt the same what you are feeling right now? What is the guarantee?  Should you not rather be happy about the path you chose/ decisions you made were on your own and nobody else decided them for you?  Then why do you even hesitate to accept the consequences of those?  Why do you feel low when somebody points out only negative consequences of them and easily forgets to look at positive stuff (however little) you were gifted along with them?     
Why other people always seem to have surpassed you in any sense-be it career or money or may be something else (whining about you deserving far better opportunities/quality life/ quality job etc. etc. than a buddy who is supposedly getting it all)?
-How can you even compare? If you want to compare, have you made sure that other conditions are at same level? Who says that you deserve better that THE person you are comparing with? That person could have some other qualities which you might not have. Or it could be just the circumstances/ situation.  And how do you know that other people who seem to have got everything better are happy and satisfied with the decisions they made in their life? There is a possibility that they might be regretting upon not getting something else!

List of questions seems to be endless. Worst part is; there are no simple/right/exact answers to them all. Only statement you can make is- IT DEPENDS, on how you look at them. Rather if you don’t spend time thinking about it, life becomes easier.
.
.
.
.
You meet someone who is facing all these questions right now. You try convincing that person that how he/she should go about it. You give advices about how not worrying about it will help. You suggest believing what is happening is good and meant to be happening that way. Life is not that bad or miserable and there are several other wonderful aspects in his/her share of life. 

AND YOU FEEL YOU ARE TRYING TO CONVINCE YOURSELF RATHER THAN CONVINCING SOMEONE ELSE!!