Saturday, July 31, 2010

The Breadwinner

हे पुस्तक मी किती वेळा वाचलंय मला आठवत नाही. अर्थात हे पुस्तक किती वेळा वाचलं, हे मोजावं लागण्याच्या पलीकडच आहे. प्रत्येक वेळेला वाचताना डोळ्यात पाणी उभं करण्याची ताकद या पुस्तकात आहे. ही कहाणी आहे परवाना या एका अफगाण मुलीची. तालिबानची दहशत, युद्ध, बॉम्बस्फोटांचे आवाज या पार्श्वभूमीवर जन्माला आलेल्या मुलांचं आयुष्य किती वेगळं असू शकतं? आपण फक्त कल्पनाच करू शकतो किंवा खर तर कल्पनाही नाही करू शकत..
आपल्या वडिलांना तालिबानी लोकांनी पकडून नेलंय या धक्क्याने तुटून गेलेली परवाना, आपल्या घरातल्या इतर लोकांकडे बघून सिद्ध होते एक धाडस करायला.. कुटुंबाला जगवण्यासाठी तिला हे करावंच लागतं.. स्वतःचे केस कापून, मुलाचे कपडे घालून अकरा वर्षाची ही छोटी मुलगी बाहेरच्या जगात पाऊल टाकते. तिचं 'बाई' पण इतरांच्या लक्षात आणू  न देता सगळं जमवण्याची कसोटीच जणू. पैसे कमावण्यासाठी तरी काय काय करावं तिने? थडगी खणून माणसांची हाडे विकायला लागली तिला.. या पुस्तकातलं एक वाक्य वाचताना माझा नेहमी थरकाप उडतो..परवानाच्या आईला जेव्हा हा प्रकार कळतो तेव्हा ती विषादान म्हणते, "काय आपल्या देशाची अवस्था झालीय,, असं दुर्दैव कधी कुणावर ओढवलं नसेल.मुलाबाळांना खाऊ घालायचं तर वाडवडिलांची हाडे खणून काढायची वेळ आलीय आपल्यावर!!"
या पुस्तकाच्या मराठी भाषांतरकार मनोगत व्यक्त करताना म्हणतात की, युद्धाच्या प्रासंगिक खुमखुमीन अधून मधून उन्मत्त होणाऱ्या आपल्या आणि शेजाराच्याही देशातल्या प्रत्येकाला परवाना भेटावी, बॉम्बगोळ्यांच्या  भडक्यात जाळून जाळून वांझ झालेल्या जमिनीत सुंदर फुलांच नाजूक रोपटं रुजवण्याचा तिचं स्वप्न आपल्यापैकी प्रत्येकाला बघता यावं, 'शहाणपण' नसेल, तर किमान 'समज' तरी यावी.
एव्हढं सगळं भयंकर, भीषण आयुष्य रोज, क्षणोक्षणी जगात असतानाही परवानाच्या मनातला असलेला आशावाद सतत जाणवत राहतो. तिचं आणि तिच्या मैत्रिणीच एक साधं, शांत सरळ आयुष्य जगण्याच स्वप्न मनाला सतत बोच देत राहत. साधं, सरळ, शांत जगण्याचही  स्वप्न पहावं लागावं??
अर्थात परवाना सारखेच आणखी कितीतरी लोक असतील या जगात..आपल्याला सहज उपलब्ध असलेल्या गोष्टीही त्यांना स्वप्नवतच असतील.. आपण कुठे आहोत त्यांच्या तुलनेत? किती छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करत बसतो आपण. आपण असतो आपल्याच कोषात. म्हणूनच असं आपल्याला आपल्या कोषातून  बाहेर काढण्यासाठी दुसऱ्याच्या आयुष्यात जरा डोकावून पाहायला लावणारं हे एक बेस्ट पुस्तक....my all time favorite.

P.S. ही पोस्ट लिहिताना जाणवत होत की खरच याबद्दल लिहिणं किती अवघड आहे.. काय आणि किती लिहिणार.. मुख्य म्हणजे कसं लिहिणार.. शब्द तोकडे पडतात. breadwinner हे नाव सार्थ करणार हे पुस्तक आणि ही कहाणी.. वाचलं नसेल तर नक्की वाचा..

Monday, July 26, 2010

नातं

तुला कुठे जास्त आवडत? मुदुमलाईला की बेंगलोरला?

मला हा प्रश्न विचारला गेला आणि मी विचारात पडले. प्रश्न जितका सोपा तितकं उत्तर अवघड आहे. प्रत्येक जागेची स्वतःची अशी खासीयत आहे. एखाद्या जागेशी आपण इतके attach  कसे होऊ शकतो? इतके पटकन धागे जुळले कसे जाऊ शकतात?

बेंगलोर मला आवडत कारण मला ते थोडंफार पुण्यासारखाच वाटतं. शहरात रहायची सवय असल्यामुळे बेंगलोरशी जुळवून घेताना फार त्रास झाला नाही. मुळात या शहराचा मी अत्यन्त थोडा भागच जास्त बघितलाय. जितके दिवस मी तिथे असते तितके IISc च्या campus मधेच जास्त असते. त्यामुळे बाहेरच्या धकाधकीच्या, प्रदूषित आणि गजबजलेल्या भागात जायची गरजच मुळात नाही वाटत.
तिथे इतकी ओळखीची माणसं आहेत, मराठी आणि मराठेतरही. शिवाय एक दोन हक्काची घर आहेत, विचारपूस करणारी, काळजी करणारी मंडळी आहेत की सगळ वातावरणच आपलसं होऊन जातं.

मुदुमलाईबद्दल काय बोलणार? हे तर माझं second home आहे. इथे office आणि घर यात फारसा फरकच नाहीये. खूप informal आहे इथली lifestyle. इथे असलं की दिवसाचं आणि तारखेचं भानच उरत नाही. सगळे दिवस सारखेच!!! weekends ल सगळे इथे असले की वेळ कसा निघून जातो त्याचा पत्ताही नाही लागत. अशाच वेळी weekends ला इतकं काम करून होतं की जे पूर्ण आठवड्यात नाही झालं. कामाचा उत्साह आला की लगेचच काम करता येतं आणि कंटाळा आला की break घेताही येतो. कधीकधी हुक्की आली की आम्ही सकाळी अगदी सहा वाजता उठून कामाला लागतो, कधी रात्री उशीरापर्यंत काम करतो आणि दुपारी एखादा सिनेमाही बघतो.
मी एकदम शहरात वाढलेली असल्यामुळे मला खेडेगावात रहायचं आकर्षण पहिल्यापासूनच फार. शाळेत असताना माझ्या सगळ्या मैत्रीणी सुट्टीत गावी जायच्या. तेव्हा मला त्यान्चा खूप हेवा वाटायचा. असं वाटायचं, आमचं अस गाव का नाही बरं? असं छान कौलारु घरात रहायच स्वप्न कधितरी पाहिलं होतं मी. ते असं कामाच्या निमित्ताने पूर्ण होइल अस कधीच वाटलं नव्हतं. अक्षरशः मी सध्या paid vacation वर आहे अस म्हणायलाही हरकत नसावी.
व्हरांड्यात बसून आम्ही असा मस्त निसर्गाचा आस्वाद घेत घेत रोज जेवतो, प्रत्येक पाच मिनिटाला आजूबाजूचं वातावरण बदलत असतं, कधी स्वच्छ नितळ सूर्यप्रकाश, कधी गच्च भरलेलं आभाळ, कधी इतकं धुकं की समोरचं घर सुद्धा दिसत नाही. पावसाची भिंत सरकत सरकत आपल्या दिशेनं येताना कधी बघितलीच नव्हती या आधी. कधी समोरचा निलगिरी मस्त ऊन खात बसलेला असतो, तर कधी ढगात हरवून गेलेला असतो. वार्‍याचा जोर कधी इतका असतो की मी उडून जाइन अस वाटतं. picnic spot म्हटल तर बरेच आहेत, म्हटलं तर नाहीतही. पण असं काही असायलच हवं का? असं कुठेतरी छान जागी बसून निवांतपणे वेळ घालवला तर ती काय ट्रीप होऊ नये?
मुळात मी हे सगळ आधी अनुभवल नसल्यामुळे मला या सगळ्याचं जास्त अप्रूप वाटतही असेल. इथे असलेल्या इतर सुविधांमुळे इथलं आमचं जीवन खूपच सुसह्य आहे हेही तितकंच सत्य आहे. इथे २४ तास वीज उपलब्ध असते. बराच वेळ वीज नाही असं गेल्या सम्पूर्ण वर्षात फक्त २-३ वेळाच घडलंय. पाणीही मुबलक प्रंमाणात उपलब्ध आहे. ईंटरनेट आहे. खाण्यापिण्याची चंगळ आहे. त्यामुळेही कदाचित मी इथे पटकन रुळले असेन.
पण त्याहीपेक्षा इथली माणसं ही जास्त कारणीभूत असावीत असं मला वाटतं. इथल्या Ph. D students/ researchers  मुळे मला आणि मीराला कधी एकटं नाही वाटलं. उलट त्यांच्या बरोबर गप्पा मारताना, त्यांच्या कामाबद्दल जाणून घेता आलं. हळूहळू आम्हालाही त्यात रस वाटू लागलाय. आमच्याच विषयाकडे बघण्याचा आमचा दृष्टीकोन बदललाय. या सगळ्यांबरोबर राहण्याची खूप सवय झालीये आता.
यापेक्षा दुसर काय हवं? नाहीतर एकटेपणी स्वर्गात जरी ठेवलं तरी कोणाचं मन रमेल असं वाटत नाही मला. निदान माझं तरी नक्कीच नही रमणार.

जगात इतर अनेक यापेक्षा सुंदर, निसर्गाचा वरदहस्त असलेल्या जागा असतीलही. नव्हे, निश्चितच आहेत. पण माझं नातं या जागेशी, इथल्या माणसांशी जुळलय खरं, अगदी मनापासून.

Thursday, July 8, 2010

यह वक्त भी कितना अजीब है,
जब चाहती हूँ की धीमे से गुजरे,
तब भागता है जैसे पीछे कोई आग लगी हो,

और जब चाहती हूँ की जल्दी बीत जाये,
तब चलता है की जैसे लोहे की ढेर सारी जंजीरे बाँधी हो पाव मैं..

पिछला साल कुछ ऐसा था
चुटकी से यूं गुजरा, पता न चला

मन कर रहा था की थोड़ा रूक जाऊं,
पीछे मुड़कर देखूं
कितना रास्ता काट दिया,
देखते देखते कहाँ तक चली आयी हूँ में

क्या पाया क्या खोया
हिसाब करने जो बैठी
हाँ, पाए जरूर कुछ चुभे हुए कांटे 
लेकिन हाथों मैं कुछ खिले फूल भी थे

जब देखा आईने में ,
पहचान न सकी खुद ही को,
सचमुच कितनी बदल गयी हूँ मैं?
खुद को पहचानना भी तो धीरे धीरे सीख लिया है
पहले तो वह भी न जानती थी

जुगनुओं से  चमचमाती रात तो देख ली,
अँधेरे से न डरना न सीख पायी,
जाड़े की धुप का मजा तो चख लिया
माँ के हाथों की नरमी न भुला पायी

अब भी दिल चाहता है कभी कभी
जाके माँ के गोद में सर रखकर आराम से सो जाऊं
लेकिन जिंदगी ने जैसे रोक रखा है मुझ को
अब तो यादो पर ही गुजारा करना होगा..

अब नजर आ रही है एक अपनी खुद की जिंदगी,
अपनी छोटीसी दुनिया अब मुझे पुकार रही है,
अब तक तो बस सपने ही थे,
सच में उड़ना अब जान रही हूँ मैं

आगे क्या होगा पता नहीं,
रास्ता कैसा होगा मालूम नहीं,
सोचती हूँ, कड़ी धूप में चाहे गुजरना लगे
थोडीसी छाव का सहारा अगर मिल जाए तो काफी है..