Wednesday, October 27, 2010

Sometimes life seems so messy, nothing falls according to plan, according to expectations. Past few days, I start in the morning enthusiastically, hoping to get outcomes with some prior expectations. But at the end of the day I find myself coming back to square one. All the efforts, whole time is likely to go waste. Then I hope that at least the next day will be mine and everything will be fine. But the other day is also not so different from previous one. And I find myself trapped in a big infinite loop; escape route of which is not known. What goes wrong?? Do I expect too much? Sometimes I feel like I am trying to fit a model where there is actually no pattern at all. Then why to coerce the model forcefully?  Why everything seems good only if there is beautiful nice pattern? Why can't I take randomness as an unavoidable part of life?

Sunday, October 24, 2010

yet another story

Have you ever searched for a thing which does not exist at all? Sounds weird,isn't it? How embarrassing the feeling could be when you put lot of efforts to find out something and after a looonngg time you come to know that the thing which you are searching for is not there?

Well, last week I went through the same situation, same feeling. Nowadays, whenever we want to have information about anything like place, things like accessories, electronic instruments,etc etc we just browse on internet and take that information for granted. We could never think even in our wildest dreams that the information could be wrong or old enough to get outdated.

Last week me and Meera were searching for an electronic accessories shop in Malleswaram. We got the information about that shop from internet. We tried calling on the contact number given bu it just gave the weird beeps and nothing else. We thought let's go simply and check it out directly. So we noted down the address and the contact number and headed towards Malleswaram. We searched  a lot.We wanted to go to temple road but half of the people were unaware about that address. One guy even asked us back which temple you are mensioning about? Is that some Ganpati temple, Sai baba temple, temple of some devimata or something else? It was a bigtime confusing question. We didn't know anything but just the temple road. After a half an hours extensive search on that afternoon, we finally got the temple road. And started looking for the survay number given in the address. Spending 5-10 minutes on the same road itself we got the correct builing but there was no banner of the shop we were looking for. confusion increased dramatically. Finally we asked the person in the footwear shop in the same building. Whatever he said, gave 440 volts shock to us. He said that the shop we were searching for is closed a year and a half back. We were standing in the place of same shop which is converted now to the footwear shop.

Our mouths were wide open when we heard this news. :)
We stepped out quietly and headed back.

It was really like searching for an address which now dosn't exist.

So people, if you are searching for an address or a place whose reference you have got from internet; make sure that address truly exists. Otherwise you will also end up facing the same situation like us.

Saturday, October 2, 2010


आमच्या इथल्या किराणामालाच्या दुकानात बरेच लोकल ब्रँडचे मस्त पदार्थ मिळतात. संध्याकाळी टाईमपास म्हणून खायला आम्ही बरेचदा असल काहीतरी आणत असतो. त्यातून काल आम्हाला एक नवीन शोध लागला. ’येळंदपळं ज्यूस’ म्हणजेच आपला मराठमोळा बोराचा गोड गर. असलं काहीतरी खाउन खरच कितीतरी वर्षं झाली आहेत. त्यामुळे शाळा कॊलेजच्या दिवसात मी केव्हा जाउन पोहोचले माझं मलाच कळलं नाही.

शाळेच्या बाहेर हातगाडीवर किंवा जवळच्याच दुकानांमधे मिळणारे आणि छोट्या शाळकरी मंडळींना भुरळ घालणारे असंख्य छान छान पदार्थ म्हणजे चिंचा, आवळे, चिनी-मिनी बोरं, पेरु, बोरकूट, चिंचगुळाच्या कांड्या, मक्याची कणसं इत्यादी इत्यादी बरेच काही. रोज शाळा सुटताना आणि मधल्या सुट्टीमधे असे पदार्थ विकणार्‍या आज्यां- आणि काका -लोकांभोवती गर्दीचा महापूर जमायचा.
आजकाल ’Bingo’ किंवा 'Lays'  असल्या महाग आणि किंमतीच्या मानाने पदार्थ कमी आणि हवाच जास्त असल्या हिशोबाने मिळणारे पदार्थ खाताना होणारं समाधान आणि त्यावेली २५ पैशात मिळणारी बोरकुटाची एक पुडी खाऊन मिळणारा आनंद याच्यात खरंच जमीन-अस्मानाचा फरक आहे.
बाहेरून विकत घेउन खाण्यात त्यावेळी एक वेगळीच मजा वाटायची.

वडापाव ही गोष्ट शाळेत असताना वर्ष-सहामहिन्यांनीच मिळणारी. सहामाही आणि वार्षिक परिक्षा झाल्यावरच आम्ही खायचॊ. तेसुद्धा नववी दहावीत गेल्यावर. त्यावेळी पण वडापावचे काय अप्रूप वाटायचे. नंतर कॊलेजल्या गेल्यावर वडापाव, सामोसा असले पदार्थ नेहमीचे झाले.

अकरावीत असताना एकदा आम्ही असाच उद्योग केला हो्ता. गरवारे कॊलेजच्या मागच्या एस. एम. जोशी पुलाच्या पाशी एक बर्फाचे गोळे विकणारा माणूस असायचा. कदाचित अजूनही असेल. आम्ही एकदा अगदी  lunch break  संपत आल्यावर ठरवलं की चला जाउन बर्फाचा गोळा खाउन येउयात. पुढचं लेक्चर maths चं होतं आणि त्या प्रोफ़ेसर बाई थोड्या खडूस म्हणूनच (कु)प्रसिद्ध होत्या. आमचा वेळेचा अंदाज चुकला. परत आलो तेव्हा लेक्चर सुरु झालं होतं. आम्हाला प्रचंड धडकी भरली होती की आता या काही म्हणणार तर नाहीत ना. कारण तसं जर काही झालं असतं तर पंचाईतच होती कारण आमच्या सगळ्यांच्याच जिभा रंगिबेरंगी झालेल्या. काही प्रश्न विचारले असते तर तोंड उचकटून उत्तर द्यायला केव्हढी लाज वाटली असती! आमच्या सुदैवाने असं काही झालं नाही. थोडा रागीट कटाक्ष सहन करून आम्हाला वर्गात प्रवेश मिळाला आणि आम्ही हुश्श झालो. 
पण आजही असं काही आठवलं की थोडी भीती वाटते आणि थोडी मजाही.

P.S. ही पोस्ट लिहून झाल्यावर परत एकदा वाचली तेव्हा असं वाटलं की, एखाद्या आजीबाईंनी ’आमच्या वेळी असलं काही नव्हतं हो’ किंवा ’आमच्या वेळी किनई..’ अशी सुरुवात करून खूप जुन्या गोष्टी सान्गितल्याच्या सुरात लिहिलं गेलंय. पण खरोखर असल्या गोष्टी करून आणि खाउन खरोखर जमाना उलटून गेल्यासारखं नक्कीच वाटतंय. 

Friday, September 24, 2010

अवतीभवती


सध्या बर्‍याच पक्ष्यांचा विणीचा हंगाम सुरु आहे. आमच्या field station च्या अंगणातही कितीतरी संसार फुलले, आणि अजूनही फुलताहेत. त्यापैकी मुख्य उल्लेख करायचा म्हणजे 'purple sunbird'. चिमणीच्या निम्म्या आकाराएव्हढा हा छोटुकला पक्षी. अगदी टीचभर म्हणावा असा. पण अतिशय सुंदर, देखणा. एका जोडीने बागेतल्या एका तारेचा आधार घेउन घरटं बांधलय. अगदी वेगळंच, घरट्याला वरुन टोपी असल्यासारखं. वरुन अगदी ओबडधोबड दिसत असल तरी आतून मात्र अगदी मऊमऊ कापूस आहे. 

परवा झालं काय, आम्हाला अचानकच एक डोकं त्या घरट्याच्या तोंडातून डोकावताना दिसलं. अगदी टुकूटुकू बघणारे दोन डोळे आम्हाला निरखत होते. अगदी छोटुले ते भिरभिरे डोळे पाहून आम्ही उड्याच मारल्या. इतका आनंद झाला होता आम्हाला. पण गंमत अशी की, आमच्या हालचाली टिपून ते पाखरू अचानक उडुन गेलं. आणि उडून गेल्यानंतर समजलं की आम्ही ज्याला पिल्लू समजत होतो, ती प्रत्यक्ष sunbird ची मादी होती आणि ती त्या घरट्यात अंडं ऊबवायला बसली होती. एक प्रकारे आमचा पोपटच झाला. तेव्हा फक्त डोक्याचा थोडासाच भाग दिसत असल्यामुळे असं झालं. खरच पूर्ण वाढ झालेला पक्षी इतका छोटा तर पिल्लू तर किती छोटं असेल? लवकरच कळेल !!


आणखी एका बुलबुलच्या जोडीनेही आपला संसार थाटला आहे. घरटं बांधायला अशी मोक्याची जागा शोधून काढली आहे, की कौतुकाची थाप मारावीशी वाटली त्याच्या पाठीवर! खरच, बाहेरुन बघितल तर कळणारच नाही अशा ठिकाणी Croton  नावाच्या (हे माझं ज्ञान नव्हे, आमच्या इथल्या botanists च्या कृपेने हे नाव इथे लिहिलय. चुकलं असल्यास कं. ज. ना.!) झुडूपाच्या अगदी आतल्या बाजूला नाजूकशा फांद्यांच्या आधाराने बांधलय. अगदी साधंसच आहे. पण perfection म्हणजे काय हे शिकण्यासाठी त्यांच्याकडे class लावावा इतकं सुबक आहे. सध्या तरी तीन अंडी आहेत. 
तर आम्ही उत्सुकतेनं वाट बघतोय सगळ्या पिल्लांची...



P.S. १)  कं. ज. ना.:  कंपनी जबाबदार नाही!
२) अजुनही कळलं नाही?? मग व. पुं. चं infection  नावाचं कथाकथन ऐका. नक्की कळेल!
३) हे कथाकथन internet  वर मिळाल्यास मला नक्की कळवा. न मिळाल्यास कं. ज. ना!



Sunday, September 5, 2010

Learning a new language is always a different experience. And it adds to the flavor if the language has its own entirely new script. If it is so, then learning could give you moments of joy as well as sometimes it could creat a situation where you just keep scratching your head!!


Past few days I have started learning Kannada. Frankly speaking, it was an accident. One of our nice friends had written some instructions for his trackers in Kannada. I found it interesting.. the way he had written them.. the handwriting ..
So I wrote a marathi phrase below that stuff which meant ' Good handwriting is precious'. and that friend immediately wrote translation of that marathi phase in 2 different languages: Kannada, tamil.
I asked him whether he could teach me writing kannada. He agreed and our evening Kannada classes started.


He wanted to learn Malyalam too. So we started together.
Starting was to write each and every letter into the corresponding script. So we took the devanagari script (thankfully we both understand that script!!) and came up with the set of letters in 3 languages.



He has picked up malyalam very fast.. I am still struggling with the initial a aa i...
 I have tried writing several names in kannada: my colleagues, friends, different places etc etc. and I enjoyed that a lot. But still I can't remember much at a time. I tend to forget immediately... so whenever I want to write something, I have to go back and refer to the original letters..

I hope this will improve some day.

Today, we tried writing the marathi phase which happened to be the driving force for me towards learning this language. A funny thing is, instead of writing that in the translated version, we wrote it in the original form, but the script is different. It goes like....



First line is in Malyalam written by my friend, and the second one is in Kannada, written by me.
It is:
'सुंदर अक्षर हाच खरा दागिना'.

The worse thing is even though the sentence talk about the good handwriting, my handwriting is not at all 'sundar' in kannada.. I find it very much childish.. as if it is written by some school going kid...


I wish I could improve it..If at all I don't give up learning...

Saturday, September 4, 2010

अंधार

या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेला
फक्त अंधार
इतका गडद, की दुसरं टोकही दिसत नाही

चराचराला स्वतःत विरघळवून टाकणारा
चराचराशी एकरूप होणारा ..अंधार

आपण म्हणजेच काळोख आणि काळोख म्हणजेच आपण
द्वैताला सहजी अद्वैत करून टाकणारा ..अंधार

Monday, August 30, 2010

  • vada pav
  • samose
  • kanda bhaji
  • mongini's cake
  • kachchi dabeli
  • panipuri
  • bhel
  • ragadapuri
  • misal
  • sabudana khichadi
  • indrayani cha usacha ras
  • lassi
  • icecream
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
Haven't had a single thing mentioned in the list above this time.
Instead, I was swallowing bunch of tablets day and night to get rid of the throat infection and fever and cough etc etc etc.
Detailed cause and effect analysis about this illness proved that the main culprit was the bread pattice from university canteen.
(my mother and sis-in-law did this whole analysis as I was not in a position to do that too :-p) 

The effect part of the this was the most cruel.
This was my long pending eating -wish-list  specially planned during Pune visit.

Thankfully whole trip wasn't waste.
Visited friends home for one day. It was a real pleasure to be there in her farm. especially the lunch in the farm was nice.

Got to eat home food after so many days. hardly ate rice in last 10 days. Enjoyed thalipeeth and varanphale.
met friends and relatives. celebrated rakshabadhan. had good time wid my nephew.

So this wasn't that bad. huh?
For junk food, chat and all... better luck next time :D

Sunday, August 15, 2010

ये तुम्हारी मेरी बातें, हमेशा यूहीं ...


आज माझ्या ब्लॉगचा वाढदिवस. ब्लॉग लिहायला सुरुवात केली तेव्हा असं वाटलही नव्हतं की तब्बल वर्षभर माझा उत्साह टिकेल. आधीच आहेत की खंडीभर ब्लॉग्स, त्यात आणखी एकाची भर कशाला? इथे लोक किती उत्तम प्रकारे लिहू शकतात, वेगवेगळ्या विषयांवर मतं मांडतात, हे बघून खूप भारी वाटायचं, पण मला कितपत जमेल याची शंका होती. पण लिहितानाच स्वतःसाठी लिहायचं, हे ठरवलं, म्हटलं, लिहून तर बघू आणि सुरुवात केली. डोक्यातले विचार कागदावर उतरवायच्या ऐवजी इथे मांडायचे एवढाच काय तो फरक. कुणी वाचेल अशी अपेक्षाही नव्हती. पण मीच लिहिलेलं मीच कितितरी वेळेला वाचत बसायचे(आजही वाचते ..)     ( traffic fidjit apply केल्यावर जाणवलं की इतरांपेक्षा मीच माझा ब्लॊग जास्त वाचते :-) )
आज काही जणं माझा ब्लॉग वाचतात, पसंतीची पावती देतात. त्यांच्यापैकी कित्येक जणांनी मला आणि मी त्यांना बघितलही नाहीये, पण तरीही आम्ही संपर्कात आलोय ते यामुळेच. त्यामुळेच मला खूप छान वाटतय, काहीतरी चांगली गोष्ट केल्याचं समाधान मिळतय.
मी लिहिणं enjoy  करते, हे जेव्हा मला जाणवलं तो माझ्यासाठी एक सुखद धक्का होता. पण त्याचबरोबर माझ्यातले बरेचसे दोषही माझ्या लक्षात आले. जरी मला लिहायला आवडत असलं तरी कुठल्याही विषयावर लिहिणं मात्र जमत नाही. मला जे अगदी खूप भावतं, ज्याच्याशी मी स्वतःला relate करू शकते, तेच लिहू शकते. त्यातही डोक्यातले विचार प्रत्यक्षात उतरताना इतके बदलत असतात की लिहिल्यानंतर जाणवतं की मला जसं लिहायचं होतं त्यापेक्षा कितीतरी वेगळ्या रुपात ते अवतरलेत! बर्‍याचदा असं होतं की योग्य शब्दच सापडत नाहीत, मग उगाचच  repalcement  करायची म्हणून केली जाते आणि त्यामुळेच ’म्हणायचं होतं एक...’ अशी गत नेहमी होते. भाषेचं महत्त्व खरोखर तेव्हा जाणवतं जेव्हा मनातले विचार मांडताना, व्यक्त करताना आपल्याला असमर्थ वाटतं. आणि तेव्हा कळतं की किती मजल अजून गाठायची आहे...
आज मी जेव्हा माझ्या सगळ्या मागच्या posts बघितल्या तेव्हा मला जाणवलं, की बहुतेककरून त्या सगळ्यांमधे उदासी, एकलकोंडेपणा, negativity अशाच भावना जास्त करून reflect झाल्या आहेत. असं का व्हावं? गेल्या वर्षात काय फक्त negative गोष्टीच जास्त घडल्या की काय? की अशा गोष्टींचाच माझ्यावर जास्त पटकन परिणाम होतो? विचार करताना जाणवलं की असं काही नाहीये. मूड चांगला असताना, आनंदी असताना तर सगळेच असतात आजूबाजूला, त्यांच्याशी चांगल्या गोष्टी share करताना काही वाटत नाही. पण कधी कधी आपला मूड चांगला नसताना, आपल्या मनातला सगळा कढ उतरवण्यासाठी, आपलं सगळच्या सगळ म्हणणं ऐकून घेण्यासाठी कुणीतरी हवं असतं. समोरच्याकडून सल्ल्याची अपेक्षा अजिबातच नसते, किंबहुना नाही मिळाला तरच उत्तम!   
फक्त मन हलकं होण्याशी कारण. अशी जागा मला माझ्या ब्लॊग्च्या रुपात मिळाली आहे, मन मोकळं करण्यासाठी!!
हा सगळा संवादच आहे, माझा माझ्याशी चाललेला, आणि त्याचबरोबर इतरांशीही...हा संवाद यापुढेही असाच चालू राहील अशी आशा आहे...
खुशनसीब समझते हैं हम खुद को,
आप से यूं मुलाकात हो गयी

दो चार बातों में गुज़रा ये वक्त
हमें हमेशा याद रहेगा, 
हमारी ज़िन्दगी के कुछ पन्ने 
अब आप के हवाले किये है हमने

पलटेंगे जब हम हमारी यह किताब
बीते पलों की ये दास्तां 
जाने कौन कौन से रंग दिखलायेगी

देख सकेंगे हम यह अपनीही दुनिया
किसी और नज़रिये से...
क्या पता,
अभी रुलानेवाले पल शायद 
हमेंही हसायेंगे कल 

बहुत सम्भलकर रखना इन्हें, 
कही गुम न हो जाये..
थामी है तुम्हारे हाथों में यह कहानी 
आखिर बडे विश्वास के साथ 
देखो, कहीं विश्वास टूट न जाये....

Saturday, July 31, 2010

The Breadwinner

हे पुस्तक मी किती वेळा वाचलंय मला आठवत नाही. अर्थात हे पुस्तक किती वेळा वाचलं, हे मोजावं लागण्याच्या पलीकडच आहे. प्रत्येक वेळेला वाचताना डोळ्यात पाणी उभं करण्याची ताकद या पुस्तकात आहे. ही कहाणी आहे परवाना या एका अफगाण मुलीची. तालिबानची दहशत, युद्ध, बॉम्बस्फोटांचे आवाज या पार्श्वभूमीवर जन्माला आलेल्या मुलांचं आयुष्य किती वेगळं असू शकतं? आपण फक्त कल्पनाच करू शकतो किंवा खर तर कल्पनाही नाही करू शकत..
आपल्या वडिलांना तालिबानी लोकांनी पकडून नेलंय या धक्क्याने तुटून गेलेली परवाना, आपल्या घरातल्या इतर लोकांकडे बघून सिद्ध होते एक धाडस करायला.. कुटुंबाला जगवण्यासाठी तिला हे करावंच लागतं.. स्वतःचे केस कापून, मुलाचे कपडे घालून अकरा वर्षाची ही छोटी मुलगी बाहेरच्या जगात पाऊल टाकते. तिचं 'बाई' पण इतरांच्या लक्षात आणू  न देता सगळं जमवण्याची कसोटीच जणू. पैसे कमावण्यासाठी तरी काय काय करावं तिने? थडगी खणून माणसांची हाडे विकायला लागली तिला.. या पुस्तकातलं एक वाक्य वाचताना माझा नेहमी थरकाप उडतो..परवानाच्या आईला जेव्हा हा प्रकार कळतो तेव्हा ती विषादान म्हणते, "काय आपल्या देशाची अवस्था झालीय,, असं दुर्दैव कधी कुणावर ओढवलं नसेल.मुलाबाळांना खाऊ घालायचं तर वाडवडिलांची हाडे खणून काढायची वेळ आलीय आपल्यावर!!"
या पुस्तकाच्या मराठी भाषांतरकार मनोगत व्यक्त करताना म्हणतात की, युद्धाच्या प्रासंगिक खुमखुमीन अधून मधून उन्मत्त होणाऱ्या आपल्या आणि शेजाराच्याही देशातल्या प्रत्येकाला परवाना भेटावी, बॉम्बगोळ्यांच्या  भडक्यात जाळून जाळून वांझ झालेल्या जमिनीत सुंदर फुलांच नाजूक रोपटं रुजवण्याचा तिचं स्वप्न आपल्यापैकी प्रत्येकाला बघता यावं, 'शहाणपण' नसेल, तर किमान 'समज' तरी यावी.
एव्हढं सगळं भयंकर, भीषण आयुष्य रोज, क्षणोक्षणी जगात असतानाही परवानाच्या मनातला असलेला आशावाद सतत जाणवत राहतो. तिचं आणि तिच्या मैत्रिणीच एक साधं, शांत सरळ आयुष्य जगण्याच स्वप्न मनाला सतत बोच देत राहत. साधं, सरळ, शांत जगण्याचही  स्वप्न पहावं लागावं??
अर्थात परवाना सारखेच आणखी कितीतरी लोक असतील या जगात..आपल्याला सहज उपलब्ध असलेल्या गोष्टीही त्यांना स्वप्नवतच असतील.. आपण कुठे आहोत त्यांच्या तुलनेत? किती छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करत बसतो आपण. आपण असतो आपल्याच कोषात. म्हणूनच असं आपल्याला आपल्या कोषातून  बाहेर काढण्यासाठी दुसऱ्याच्या आयुष्यात जरा डोकावून पाहायला लावणारं हे एक बेस्ट पुस्तक....my all time favorite.

P.S. ही पोस्ट लिहिताना जाणवत होत की खरच याबद्दल लिहिणं किती अवघड आहे.. काय आणि किती लिहिणार.. मुख्य म्हणजे कसं लिहिणार.. शब्द तोकडे पडतात. breadwinner हे नाव सार्थ करणार हे पुस्तक आणि ही कहाणी.. वाचलं नसेल तर नक्की वाचा..

Monday, July 26, 2010

नातं

तुला कुठे जास्त आवडत? मुदुमलाईला की बेंगलोरला?

मला हा प्रश्न विचारला गेला आणि मी विचारात पडले. प्रश्न जितका सोपा तितकं उत्तर अवघड आहे. प्रत्येक जागेची स्वतःची अशी खासीयत आहे. एखाद्या जागेशी आपण इतके attach  कसे होऊ शकतो? इतके पटकन धागे जुळले कसे जाऊ शकतात?

बेंगलोर मला आवडत कारण मला ते थोडंफार पुण्यासारखाच वाटतं. शहरात रहायची सवय असल्यामुळे बेंगलोरशी जुळवून घेताना फार त्रास झाला नाही. मुळात या शहराचा मी अत्यन्त थोडा भागच जास्त बघितलाय. जितके दिवस मी तिथे असते तितके IISc च्या campus मधेच जास्त असते. त्यामुळे बाहेरच्या धकाधकीच्या, प्रदूषित आणि गजबजलेल्या भागात जायची गरजच मुळात नाही वाटत.
तिथे इतकी ओळखीची माणसं आहेत, मराठी आणि मराठेतरही. शिवाय एक दोन हक्काची घर आहेत, विचारपूस करणारी, काळजी करणारी मंडळी आहेत की सगळ वातावरणच आपलसं होऊन जातं.

मुदुमलाईबद्दल काय बोलणार? हे तर माझं second home आहे. इथे office आणि घर यात फारसा फरकच नाहीये. खूप informal आहे इथली lifestyle. इथे असलं की दिवसाचं आणि तारखेचं भानच उरत नाही. सगळे दिवस सारखेच!!! weekends ल सगळे इथे असले की वेळ कसा निघून जातो त्याचा पत्ताही नाही लागत. अशाच वेळी weekends ला इतकं काम करून होतं की जे पूर्ण आठवड्यात नाही झालं. कामाचा उत्साह आला की लगेचच काम करता येतं आणि कंटाळा आला की break घेताही येतो. कधीकधी हुक्की आली की आम्ही सकाळी अगदी सहा वाजता उठून कामाला लागतो, कधी रात्री उशीरापर्यंत काम करतो आणि दुपारी एखादा सिनेमाही बघतो.
मी एकदम शहरात वाढलेली असल्यामुळे मला खेडेगावात रहायचं आकर्षण पहिल्यापासूनच फार. शाळेत असताना माझ्या सगळ्या मैत्रीणी सुट्टीत गावी जायच्या. तेव्हा मला त्यान्चा खूप हेवा वाटायचा. असं वाटायचं, आमचं अस गाव का नाही बरं? असं छान कौलारु घरात रहायच स्वप्न कधितरी पाहिलं होतं मी. ते असं कामाच्या निमित्ताने पूर्ण होइल अस कधीच वाटलं नव्हतं. अक्षरशः मी सध्या paid vacation वर आहे अस म्हणायलाही हरकत नसावी.
व्हरांड्यात बसून आम्ही असा मस्त निसर्गाचा आस्वाद घेत घेत रोज जेवतो, प्रत्येक पाच मिनिटाला आजूबाजूचं वातावरण बदलत असतं, कधी स्वच्छ नितळ सूर्यप्रकाश, कधी गच्च भरलेलं आभाळ, कधी इतकं धुकं की समोरचं घर सुद्धा दिसत नाही. पावसाची भिंत सरकत सरकत आपल्या दिशेनं येताना कधी बघितलीच नव्हती या आधी. कधी समोरचा निलगिरी मस्त ऊन खात बसलेला असतो, तर कधी ढगात हरवून गेलेला असतो. वार्‍याचा जोर कधी इतका असतो की मी उडून जाइन अस वाटतं. picnic spot म्हटल तर बरेच आहेत, म्हटलं तर नाहीतही. पण असं काही असायलच हवं का? असं कुठेतरी छान जागी बसून निवांतपणे वेळ घालवला तर ती काय ट्रीप होऊ नये?
मुळात मी हे सगळ आधी अनुभवल नसल्यामुळे मला या सगळ्याचं जास्त अप्रूप वाटतही असेल. इथे असलेल्या इतर सुविधांमुळे इथलं आमचं जीवन खूपच सुसह्य आहे हेही तितकंच सत्य आहे. इथे २४ तास वीज उपलब्ध असते. बराच वेळ वीज नाही असं गेल्या सम्पूर्ण वर्षात फक्त २-३ वेळाच घडलंय. पाणीही मुबलक प्रंमाणात उपलब्ध आहे. ईंटरनेट आहे. खाण्यापिण्याची चंगळ आहे. त्यामुळेही कदाचित मी इथे पटकन रुळले असेन.
पण त्याहीपेक्षा इथली माणसं ही जास्त कारणीभूत असावीत असं मला वाटतं. इथल्या Ph. D students/ researchers  मुळे मला आणि मीराला कधी एकटं नाही वाटलं. उलट त्यांच्या बरोबर गप्पा मारताना, त्यांच्या कामाबद्दल जाणून घेता आलं. हळूहळू आम्हालाही त्यात रस वाटू लागलाय. आमच्याच विषयाकडे बघण्याचा आमचा दृष्टीकोन बदललाय. या सगळ्यांबरोबर राहण्याची खूप सवय झालीये आता.
यापेक्षा दुसर काय हवं? नाहीतर एकटेपणी स्वर्गात जरी ठेवलं तरी कोणाचं मन रमेल असं वाटत नाही मला. निदान माझं तरी नक्कीच नही रमणार.

जगात इतर अनेक यापेक्षा सुंदर, निसर्गाचा वरदहस्त असलेल्या जागा असतीलही. नव्हे, निश्चितच आहेत. पण माझं नातं या जागेशी, इथल्या माणसांशी जुळलय खरं, अगदी मनापासून.

Thursday, July 8, 2010

यह वक्त भी कितना अजीब है,
जब चाहती हूँ की धीमे से गुजरे,
तब भागता है जैसे पीछे कोई आग लगी हो,

और जब चाहती हूँ की जल्दी बीत जाये,
तब चलता है की जैसे लोहे की ढेर सारी जंजीरे बाँधी हो पाव मैं..

पिछला साल कुछ ऐसा था
चुटकी से यूं गुजरा, पता न चला

मन कर रहा था की थोड़ा रूक जाऊं,
पीछे मुड़कर देखूं
कितना रास्ता काट दिया,
देखते देखते कहाँ तक चली आयी हूँ में

क्या पाया क्या खोया
हिसाब करने जो बैठी
हाँ, पाए जरूर कुछ चुभे हुए कांटे 
लेकिन हाथों मैं कुछ खिले फूल भी थे

जब देखा आईने में ,
पहचान न सकी खुद ही को,
सचमुच कितनी बदल गयी हूँ मैं?
खुद को पहचानना भी तो धीरे धीरे सीख लिया है
पहले तो वह भी न जानती थी

जुगनुओं से  चमचमाती रात तो देख ली,
अँधेरे से न डरना न सीख पायी,
जाड़े की धुप का मजा तो चख लिया
माँ के हाथों की नरमी न भुला पायी

अब भी दिल चाहता है कभी कभी
जाके माँ के गोद में सर रखकर आराम से सो जाऊं
लेकिन जिंदगी ने जैसे रोक रखा है मुझ को
अब तो यादो पर ही गुजारा करना होगा..

अब नजर आ रही है एक अपनी खुद की जिंदगी,
अपनी छोटीसी दुनिया अब मुझे पुकार रही है,
अब तक तो बस सपने ही थे,
सच में उड़ना अब जान रही हूँ मैं

आगे क्या होगा पता नहीं,
रास्ता कैसा होगा मालूम नहीं,
सोचती हूँ, कड़ी धूप में चाहे गुजरना लगे
थोडीसी छाव का सहारा अगर मिल जाए तो काफी है..

Tuesday, June 29, 2010

त्यांच्या चष्म्यातून...

परवाचीच गोष्ट.
काही दिवसांपूर्वीच आम्ही नव्या घरात रहायला गेलोय. हे नवं घर आमच्या जुन्या घरापासून थोड्याशाच अंतरावर आहे. त्या भागात एक माकडांची टोळी सुद्धा राहते. रोज सकाळी सकाळी छपरावरती दणादण उड्या मारण्याच्या त्यांच्या सवयीची आम्ही हळूहळू सवय करून घेत आहोत. आम्ही इथे येण्यापूर्वी हे घर रिकामंच होतं. ही सगळी मंडळी त्या घरात कधीही जाऊनयेऊन असायची. त्यामुळे आम्ही गेल्यावर पहिले काही दिवस आम्ही त्यांच्यावर नजर ठेवून होतो आणि ते आमच्यावर!! आम्ही असल्यामुळे त्यांच्या अगदी घरातल्या अंगणात वगैरे येण्यावर बंधनं आली खरी... तर झालं काय, त्या टोळीतल एक माकड (अगाऊ कार्टं!) त्या दिवशी आलं होतं. मी अचानक त्याच्या समोर आल्यामुळे ते दचकलं आणि मी सुद्धा थोडी टरकलेच... तसं जाळीचे दार असल्यामुळे काही काळजी नव्हती. तर आता मी होते जाळीच्या एका बाजूला घरात आणि ते होतं बाहेर. म्हणजे उलटी परिस्थिती- मी जणू पिंजर्‍यात होते आणि माकड मला पिंजर्‍याच्या बाहेरून न्याहाळत होतं. दोन मिनिटं आम्ही दोघेही एकमेकांकडे डोळे वटारून पहात होतो. दोघेही एकमेकांचा अंदाज घेत होतो. दोघांनाही माहीत नव्हतं की समोरचा प्राणी नक्की काय विचार करतोय. आपल्याला घाबरलाय, की आपल्यावर हल्ला करण्याच्या बेतात आहे की पळून जाण्याच्या विचारात आहे. अशा बिकट परिस्थितीत बराच वेळ गेला. समोरचा काहीच करेना म्हणून शेवटी आम्ही दोघेही वैतागलो आणि आपापल्या कामाला निघून गेलो!
मागच्या आठवड्यात आम्ही २० गव्यांचा कळप पहिला. २० गव्यांचे ४० डोळे आम्हाला आणि आम्हा ५-६ जणांचे १५-१६ (चष्म्याचे २-२ एक्स्ट्रा धरुन!) त्यांना बराच वेळ निरखत होते. शेवटी आम्हाला डॊळे भरून पाहून घेऊन कंटाळून ते आल्या वाटेने निघून गेले.

त्यावेळेपासून मी विचार करत होते की माणसं समोर आली की प्राणी काय विचार करत असतील?

माणसाला एकंदरीतच सगळ्याच गोष्टींबद्दल कुतुहल असतं. खरंच किती क्रेझी असतात लोक प्राणी बघण्यासाठी. जगाच्या कुठल्याकुठल्या कोपर्‍यात भटकतात. तहानभुकेची पर्वा न करता रानोमाळ हिंडतात..जीवाचा आटापिटा करतात. एव्हढं करुन मिळतं काय? एखाद्या प्राण्याची निसटती छबी. त्या एखाद्या प्राण्याचं केवळ ओझरतं दर्शन घेण्यासाठी इतका अट्टाहास? पण तरीही हौस ना...
बरं, आणि काही काही लोकांना हरणं किंवा हत्ती नुसते दिसून उपयोग नाही.. ऊं!! त्यात काय, हत्ती तर आहे. आम्हाला वाघ बघायला हवा.. अरे, हे काय?
बरं बघितला समजा वाघ, पुढे काय? काय करतो आपण त्याचं नंतर?

आणि प्राणी बघायचे म्हणजे नक्की काय? हत्ती गवत खातो कसा, हत्तीचे दात, सोंड किती कौतुकाने न्याहाळतो आपण. हत्तीला याबद्दल काय वाटत असेल? कधी कधी असं वाटतं एखादा हत्ती चिडून सोंड वेळावून अचानक म्हणेल, काय शिंची कटकट आहे, किती गोंधळ घालतायत ही माणसं, निवांतपणे गवत पण खाऊ देत नाहीत. एक सोंडेने रपाटा हाणला म्हणजे कळेल बेट्यांना.
वाघोबाची तर गोष्टच वेगळी. त्याच्या चालण्यावरही लोक फिदा होतात. पण समजा, नसली एखाद्या वाघाची चाल ऐटदार, म्हणून काय मग त्याच्या ’वाघोबा’ पणाला बाधा येते काय? त्याला नसेल का असं वाटत - साली माणसाची जातच विचित्र ! सुखाने शिकार करु, चार घास खाउन मस्तपैकी डरकाळी फोडून निवांतपणे ताणून द्यावं म्हटलं तर ते नाही. उठसूट आपले माझ्या मागे. जरा प्रायव्हसी म्हणून मिळू देईनात की...

खरंच कल्पना करा हं, आपण जेवताना आपण घास कसा तोडतो, किती मोठा घास घेतो, कसा तोंडात घालतो, किती मोठा ’आ’ करतो, किती पटकन गिळतो वगैरे वगैरे गोष्टी सदैव कुणीतरी निरखून निरखून बघू लागलं तर ? आपण चालतो कसं, बसतो कसं, किती डौलदार चाल आहे किंवा किती शेळपट वाटतोय इत्यादी इत्यादी कमेंट्स जर उठसूट आपल्यावर कुणी करु लागलं तर कसं बरं वाटेल आपल्याला?


प्राण्यांना नसेल का हो असं काही वाटत?

Friday, June 25, 2010

भूतकाळात डोकावताना...२

दादाआजोबा आणि माईआजी

दादाआजोबांबद्दल मी जेव्हाजेव्हा विचार करते तेव्हातेव्हा त्यांची शांत मूर्तीच डोळ्यासमोर येते. मी जेव्हढं त्यांना बघितलंय तेव्हढ्या सगळ्या आठवणींत त्यांची रागावलेली मुद्रा तर सोडाच पण कुणाबद्दल उणादुणा शब्द उच्चारल्याची साधी खूणही सापडत नाही. आजोबांची पूर्ण भगवद्गीता पाठ होती. ते बर्‍याचदा पूर्ण गीता वाचायचे. दुपारच्या शांत वेळी त्यांच गीतापठण चालू असताना आम्हाला त्याना डिस्टर्ब न करण्याचा इशारा मिळत असे. अर्थात त्यांना डिस्टर्ब केलं तरी ते कही ओरडाबिरडायचे नाहीत, पण मुळात त्याना बघून आम्हाला तशी इच्छाही नाही व्हायची. हृदयविकाराचा झटका येउन गेल्यानंतर त्यांनी स्वतःला जे maintain  केलं होतं ते खरोखर दाद देण्यासारखं होतं. वेळच्यावेळी औषधं घेणं, कुठली औषधं संपली आहेत, कुठली आणायची आहेत त्याची यादी करुन ती आणणं/आणवणं हे अगदी शिस्तीत आणि वेळच्या वेळी व्हायचं. कुणीही न सांगता सवरता!
त्यांच्या अतिशांत वृत्तीमुळे माईआजीचा मात्र भडका उडायचा कधीकधी!! माईआजी माझ्या आईची सावत्र आई. खरं तर हा शब्द उच्चारताना मला इतका त्रास होतोय की कुणी कल्पनाही नाही करु शकणार. ही गोष्ट मला फार उशीरा म्हणजे दहावीला गेल्यावर समजली. आईची आई गेली तेव्हा समस्त मामा-मावशी मंडळी लहान होती म्हणून माझ्या पणजोबांनी आजोबांना दुसरं लग्न करायला लावलं असं नंतर आईशी बोलताना समजलं. अर्थात त्याकाळी दुसर लग्न ही काही फार मोठी बाब नव्हती. याबद्दल इथे लिहीण्याचं खरं तर काहीच कारण नाही.पण मला अतिशय अभिमान वाटतो या गोष्टीचा की तो so called ’सावत्रपणा’ कुठल्याच बाबतीत अजिबात आड आला नाही. कधीच नाही.त्यामुळे जेव्हाजेव्हा मी या गोष्टीचा विचार करते तेव्हातेव्हा माझ्या मनातला तिच्याबद्दलचा आदर दुप्पट वाढतो.
किंबहुना मी माझ्या सगळ्या मामांमधे शैलेश-प्रसाद मामांच्या जास्त जवळ आहे. शनवारात राहत असेपर्यंत ठीक होतं, पण कोथरूडला शिफ़्ट झाल्यावर गावात खरेदीबिरेदीसठी जाताना आजीला मामी किंवा माझी आई सोबत लागायचीच. आजीच्या हातची शेवयाची खीर आणि चैत्रागौरीच्या वेळची कैरीची आंबट डाळ-पन्हं हे पदार्थ माझ्या विशेष आवडीचे होते.
आजी छोट्या छोट्या गोष्टींचंही कौतुक करायची. एकदा तर धुतलेलं धुणं मी नीट दांडीवर वाळत टाकल्यामुळे तिने मला खूश होऊन शाबासकी दिली होती. आदित्यने जेव्हा पहिल्या पगारातून त्यांना cordless phone घेउन दिला होत तेव्हा तिनं तो सगळ्यांना मोठ्या कौतुकाने दाखवला होता. नातवाचा अभिमान तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहत होता.
तेव्हाच मीही ठरवलं होतं की मी पण नोकरी लागली त्यांच्या्साठी नक्की काहीतरी घेईन. या सार्‍या गोष्टींना आता फार उशीर झालाय खरं तर. काळाने ती संधी माझ्याकडून कढून घेतलीये. काळाचा तरी काय दोष म्हणा, माझ्या अजागळ पणामुळेच झालंय हे सगळं.
बंगलोरला आल्यावर दोनदा पुण्याला जाणं झालं. अनिरुद्धच्या बारशाच्या वेळी आजोबांना चालणं शक्य नसल्याने फक्त आजीच आली होती.नंतर जेव्हा फ़ेब्रुवारीत गेले तेव्हा गेल्याबरोबर आजोबांच्या जाण्याचा धक्का सहन करावा लागला होता. आजोबांचं शेवटचं दर्शन केवळ एका दिवसाने चुकलं! आणि आता चार महिन्यांतच आजीही गेली. तिच अखेरचं दर्शनच काय तर दहाव्यालाही मी तिकडे नसणार. मी इतकी कमनशिबी कशी???

Sunday, June 20, 2010

भूतकाळात डोकावताना... १

काय लिहू आणि कुठून सुरुवात करु तेच समजत नाहिये. आज माईआजी गेली. गेल्या चार महिन्यातली ही दुसरी घटना आणि गेल्या दोन वर्षातली सहावी. मोत्याची माळ तुटून एक एक करत मोती गळावेत तसतसे एक एक करुन सगळे गेले. आजी आजोबांच्या त्या पूर्ण पिढीचं अस्तित्व आता संपलय. इतक्या सार्‍या घटना इतक्या कमी काळात घडल्या आहेत, की आता डोळ्यातले अश्रूसुद्धा बंड करून उठलेत. मन मात्र प्रत्येकवेळी तितकंच सैरभैर होतं. आजही तसंच झालंय. सगळ्यांच्या आठवणी मनात दाटून आल्या आहेत. त्या आठवणींचे मोती मी वेचण्याच प्रयत्न करतेय.
खरं तर कुठल्याच आजी आजोबांची मी ’अगदी लाडाची’ वगैरे अजिबातच नव्हते. अनेक नातवंडांपैकी मीही एक. पण आईचे काका काकू-ज्यांना मी काकाआजोबा आणि काकूआजी म्हणायचे, आईचे आई-वडिल म्हणजे माईआजी-दादाआजोबा आणि बाबांचे आई-वडिल -केंदूरचे आजी आजोबा यांच्याबद्दलच्या कितीतरी आठवणींनी कितीतरी वेळापासून माझ्या मनात फेर धरलाय.


काकाआजोबा आणि काकूआजी 


माझ्या शाळेपासून माझं आजोळ खूप जवळ होतं. शाळा सुटली की मी तिकडे जायचे. आई तिथे माझी वाट बघत थांबलेली असायची.
मग काकूआजी कधी थालीपीठ तर कधी साखरांबा-पोळी द्यायची. दुपारच्या वेळेला टी.व्ही वर ’हम पाँच’ आणि ’शांती’ नावाच्या सीरीयल्स लागायच्या. काकाआजोबा या सीरीयल्सचं नेहमीचं गिर्‍हाईक!!! त्यावेळी फार काही कळत नसताना (मुळात कळून घ्यायची आवश्यकता नसताना) मी ती त्यांच्याबरोबर बघायचे. ’हम पाँच’ चं attraction एव्हढ्यासाठी, की त्यात प्रिया तेंडूलकर फोटोतून बोलताना दाखवायचे. त्यावेळी ते फार गंमतशीर वाटे.
काकाआजोबांनी फुलवलेली बाग हा आवडीचा विषय. विशेषतः संध्याकाळच्या झाडांना पाणी घालायच्या वेळेची आम्ही आतुरतेनं वाट बघायचो. नळीने पाणी घालायची पहिल्यांदा संधी मिळावी म्हणून आजोबांकडे वशिला लावायचो. झाडांना पाणी घालणे यापेक्षाही पाणी घालायच्या नळीला पुढे बोट लावून सर्वात लांब फवारा कोणाचा जातो, यातच स्पर्धा असायची. अंगणात सडा घालण्याचं काम आम्ही मोठ्या हौसेनं करायचो. त्या नादात रस्त्यावरची जाणारीयेणारी लोकं भिजायची! तक्रार अर्थातच आजोबांकडे! पण पुनःश्च ’येरे माझ्या मागल्या’ व्हायला कितीसा वेळ लागतो?
जोवर पणजीआजी होती तोवर तिचा एक लिमलेट्च्या, श्रीखंडाच्या गोळ्यांचा खास असा डबा असायचा. खूश झाली, कि ती त्यातनं हळूच एक गोळी काढून हातावर ठेवी. इकडे काकाआजोबांच्या भाजक्या बडिशेपच्या डब्यावरही आमचा डोळा असायचा. त्या खास बडिशेपचे बकाणेच्या बकाणे आम्ही भरायचो.
काम करताना एकीकडे ’श्रीराम जय राम जय जय राम’ चा जप चालायचा. काहीही झालं की त्यांचं- "तो आहे ना वर बसलेला..बघतोय सगळं. तो माझा श्रीरामच मल सगळं देईल!" हे वाक्य कायम असायचं.
काकू आजी गेली तो दिवस अजून आठवतोय मला...गौरी जेवायचा दिवस होता तो. सौभाग्याचं लेणं लेवून -अहेवपणी ती गेली. तिच्या देहावर फुलं टाकून तिचं शेवटचं दर्शन घेताना असं वाटत होतं की जणू तिचा श्वासोच्छ्वास मंदपणे अजूनही चालू आहे. ती थरथर जी मला जाणवत होती ती खरोखरची होती की केवळ माझ्या डोळ्यातल्या पाण्यामुळे मला तसा भास झाला होता हे माझ्यासाठी अजूनही न उलगडलेलं कोडं आहे.
काकूआजी हॉस्पिटलमधे अ‍ॅडमिट असताना एकदा माझ्या आईने तिच्यासाठी तांदुळाची उकड करून नेली होती. त्यातली तिने खाउन झाल्यावर उरलेली उकड मी संपवली होती. त्यानन्तर कित्येकदा आईने उकड केली, पण त्यादिवशीच्या उकडीची चव मला परत कधीच अनुभवायला मिळालेली नाही. आता तर तांदुळाची उकड आणि काकूआजी या दोन्ही आठवणी येताना  सोबत हातात हात घालूनच येतात..........

Saturday, June 12, 2010

मरे एक त्याचा....

मृत्यू, एक कडवट सत्य.
 प्रत्येकाच्या नशिबात लिहिलेलाच
मनुष्य असो वा जनावर, गरीब असो वा श्रीमंत,
सुखी असो वा दुखी, सज्जन वा दुर्जन.
तिथे भेदाभेद कधीच नाही.

उगवलेला सूर्य मावळणार हे जितकं सहज तितकंच..
जन्माला आलेला कधी ना कधी मरणार हेही.
मग तरीही हे सत्य सहज स्वीकारता का नाही येत?
दरवेळेला ते मनाला टोचणी देऊन का जातं?
आपल्या डोळ्यांपुढे कुणीतरी शेवटचे श्वास घेतो आणि तरीही..
तरीही आपण काही म्हणता काहीच नाही करू शकत
ही हतबलता अनुभवणं किती वेदनामय असता!

आपले जीवन पूर्णपणे जगून मग मृत्यू आल्यास एकवेळ हरकत नाही.
पण ज्यावेळी डोळे नीट उघडून जग बघायच्या आधीच मृत्यूला सामोरे जावे लागले तर?

का त्या छोट्या जीवाच्या नशिबी हा सारा खेळ?
अजून पंखसुध्दा फुटले नव्हते त्याला व्यवस्थित 
भरारीची आस असणं दूरच 
दाणापाणी खाण्यासाठी आपली चिमणी चोच उघडावी लागते हेही कळण्याचं वय नव्हतं त्याचं

काय बिघडलं असतं जर ते चिमणं पाखरू जिवंत राहिलं असतं तर?
बघितलं असतं त्यानेही ते निळशार आभाळ.
मारली असती एक स्वच्छंद फेरी उंच आभाळात
केला असता त्याच्या चिमण्या आवाजात गोड किलबिलाट…
खरंच, काही बिघडलं असतं का??

पण नाही.
आणि काळदेखील यावा कसा?
आपल्याच भाऊबंदाच्या रूपाने.
मजा वाटते का मृत्यूला
इतक्या कठोरपणे वागण्यातच?

जिवंत असतानाची त्याची थरथर,
उबेचा हात लागल्यावर थोडी कमी झाली होती..
पण तरीही काळापुढे आपण सारे फिकेच..
त्याच्या थंडावलेल्या शरीराला स्पर्श करताना माझ्याच शरीरावर शहारे उमटले
आणि आठवल्या समर्थांच्या ओळी…

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात आहे…

Monday, June 7, 2010

Inspiration

Today I am feeling very good. I wanna do lot of work, want to immerse myself into the deep sea of work, really want to get drawn into it.

In past few days, I have hardly done work (as in with some useful output). I spent my all time in playing, chatting, sleeping, watching movies... Now I am suddenly finding myself uninterested in all those things. I think the reason behind is lack of motivation, lack of interest towards the job I am supposed to do.
I read so many articles / books in those days but hardly any was related to my own area. I don't know why but I don't feel like reading the books related to statistics (its an alert for me... isn't it??) May be it is in my nature. Given a choice, I will never do serious/ study kind of stuff. Though I have tried to change myself so many times, a little distraction is enough to bring me on same old route.


Today morning while sipping my tea, I was observing a mantis on the iron mesh wall of our house. It was constantly trying to climb it up. It started with small steps, wisely utilizing its energy. The picture is still in front of my eyes. I was so amazed and occupied watching it, that I completely forgot to sip my tea ( I realized that when I found myself sipping cold tea after some time)
What gives energy, motivation to that 3-4 cm long with hardly few grams ( or should I say milligrams?) weight to work against the gravitational force resulting due to climbing the wall in 90 degrees? Still, with constant efforts, it climbed that wall successfully.

Why one need to go around looking for the sources of inspiration when it could be there right in front front of our eyes? Why can't little creatures like mantis be an inspiration? It can, surely.

We just need to look around with open eyes.

Thursday, May 27, 2010

उन्हाळा आणि आंबे

हा पहिलाच असा उन्हाळा आहे की जेव्हा मी आंबे, आमरस आणि आईस्क्रीम यापैकी काहीही खाल्लं नाहीये.... गेले कित्येक दिवस मला हापूस आंबे खायची जबरदस्त इच्छा होतेय. पण काय करणार, इथे खास असे आंबे बाजारात दिसत नाहीत..टिपिकल पुणेरी असल्याने 'पुण्याच्या आंब्यांची चव कश्शा कश्शाला नाही हो...' असं म्हणायची संधीही मला सोडायची नव्हती.. पण औषधालाही आंबा दिसला नाही तर मग काय करता हो?? इथले लोक आंब्यांशिवाय जगूच कसे शकतात मुळी हा मला पडलेला मुख्य प्रश्न आहे. ( अर्थात, मी अजून जिवंत आहे यावरून 'आंब्यांशिवाय जगता येत' यावर मला विश्वास ठेवावाच लागत आहे..:)


आणि हापूस ला नावं ठेवणारे पण लोक बघितले बर का!! अजबच आहे म्हणा की ही दुनिया...



दुपारची कडक उन्हाची वेळ, डोक्यावरती गरगरता पंखा, हापूस आंब्याच्या रसाची वाटी, तीही अगदी काठोकाठ भरलेली, सोबत गरमागरम पोळी आणि फ्रीज मध्ये दुपारी उन्हं उतरताना पिण्यासाठी म्हणून ठेवलेलं कैरीचा पन्ह, आहाहा ... उन्हाळ्याची खरी मजा यातच नाही का?

पण सध्यातरी यापैकी इथे काहीच नाही.. फक्त स्वप्नातही मला येणारा तो आंब्यांचा वास मात्र माझ्या सोबतीला सदैव असतो...

Saturday, May 22, 2010

लफ़्ज आजकल मुझसे कुछ रूठ गए हैं..
न जाने कहाँ जाके छुप गए हैं..

तनहाई में भी राह देखती रहती हूँ उनकी..

मगर वह ज़ालिम कुछ ऐसे हैं की
यूं लुक्काछुपी में मज़े ले रहे हैं..

ए लफ़्जों, मुझे ऐसे न सताया करो..
मेरी मर्जी हो न हो
रोज मेरी गली आया करो..

ज़िन्दगी का रास्ता तो अकेले चलना ही पड़ेगा मुझे..
कम से कम तुम्हारे साथ का झूठा ही सही
लालच दिखाया करो...

Saturday, May 8, 2010

Mere saath rehta tha Ek saaya mera
Magar aaj kal hum alag ho gaye hai

Usse ye shikayat thi mujhse
ki usse mitaane ki khaatir hi main yoon
andheron mein chala karta hoon
Taki woh mera T'aakub na kar paaye magar

Mujhe ye shikayat thi ki
Main Ujaalon mein to akela bhi chal sakta tha
Magar Andheron mein jab mujhe jarurat thi ek ahbaab ki
to woh gaayab tha, uska nishaan tak na baaki tha.

Mere saath rehta tha saaya mera
Shareek-E-Hayaat aur saathi mera
Magar aajkal hum alag ho gaye hai!

-Gulzar

Saturday, May 1, 2010

सोबत


पालटले आहेत दिवस तुझे..
देण्यासारखं आता तुझ्याजवळ काहीच नाही उरलं...
द्यायला होतं तेव्हा खूप काही दिलंस तू..
अगदी कसलाही विचार न करता

आता नशीबच फिरलं आहे जणू
कुणीच उरलं नाही तुझ्या साथीला..
पण मी मात्र विसरलो नाहीये तुला.
विसरू तरी कसा शकतो मी?
तुझ्याच तर अंगाखांद्यावर खेळलो, वाढलो.
उंच आभाळात झेप घ्यायला शिकलो.

गेले त्यांना जाऊ देत,
मी मात्र तुझ्याबरोबरच राहीन..
पुढच्या पावसाची वाट बघत .. सदैव..

P.S. @ Deep, sorry again. I started writing this post in english, switched to hindi; but ended up in marathi again. It is much easier to put my feelings in marathi. :(

Tuesday, April 20, 2010

again.. time has come.
time to go back..

Somehow,I don't feel like I have spent more than 3 months(continuously) here.
Just few days have passed. Till few days ago I was trying to get used to Bangalore routine and now that I am used to it, time has come to move once again...

I am feeling lazy to pack everything up once again, to travel.
But I think this is always the case with me.
I remember the day I was traveling Pune-Bangalore for the first time in my life.
I remember the day I was traveling Bangalore-Mudumalai for the first time.
This was the same feeling that time also.

But why now?
Now the situation is all different. I know where I am going. I know that place, I know people there. I like to be there.

But still, I don't want to go there. Why?
Have I become too rigid?

Friday, April 16, 2010

आज मी अतिशय आनंदी आहे आणि थोडीशी दुःखी सुद्धा. आज आमचा कोर्स संपला. गेले ४ महिने कसे गेले ते कळले नाही. बहुतांशी भाग आधीच शिकले होते. तरीही एका नवीन approach ने शिकता आलं. वेगळ्या पद्धतीने विचार केला गेला.. आणि हो, fourier analysis पण काही अंशी शिकले. एखादी गोष्ट स्वतः होऊन शिकायची आहे, इंटरेस्ट आहे म्हणून शिकणं आणि कम्पल्सरी असल्यामुळे शिकणं किती वेगळं असतं.. आतापर्यंत मी शिकले, courses attend केले, कारण ते compulsory होते.. आणि या वेळी मी शिकले कारण मला ते शिकायचं होतं, स्वतःची इच्छा होती ... That makes difference !!

आतापर्यंत टर्म संपली की खूप आनंद व्हायचा.. चला, एकदाचं संपलं.. असं वाटायचं..
आजही वाटतंय, नाही असं नाही. (उगाच खोटं कशाला बोला?) . पण फरक इतकाच आहे की तितकंच वाईट पण वाटतंय. आज असं वाटतच नव्हतं की ते lecture संपावं.. अजून शिकवा, अजून शिकवा, असं मनात सारखं ओरडत होते (सरांना उद्देशून!). पण काय करणार? आम्ही नंतर गेलो सुद्धा सांगायला, की extra lectures घेऊन एक दुसरा topic पण cover करा म्हणून.. पण त्यांनी ऐकलं नाही... म्हणून थोडं जास्त वाईट वाटतंय...अर्थात बाकी कुणालाच इंटरेस्ट नव्हता आणि professor ना सुद्धा ...भरीस भर म्हणजे मी हा course audit करत असल्यामुळे professor ने मला तुम्हाला exam द्यावीशी वाटतेय का? द्यायची असेल तर द्या.. असे म्हटले .. एरव्ही काय मस्त वाटलं असतं.. जर exam द्यावी की नाही हा निर्णय जर माझ्यावर सोडला असता तर.. पण आज नाही वाटलं. वाटलं, या विषयाचा अभ्यास मी जर कम्पल्सरी असता तर चांगल्या प्रकारे केला असता.

जाऊ देत. पण थोडं काहीतरी शिकले आहे हे काय कमी आहे?

Tuesday, April 13, 2010

हे जीवन सुंदर आहे...

गेले काही दिवस मी बऱ्यापैकी 'अवचट' मय होऊन गेले आहे.याआधी प्रकाश नारायण संत, शिवाजी सावंत, व पु, पु. ल. आणि असेच कितीतरी लोक वाचताना अशीच हरवून गेले होते. एखाद्याच्या लिखाणाने भारावून गेले आहे अशी अवस्था खूप दिवसांनी अनुभवायला मिळाली.
व.पु. नी कुठेतरी म्हटलंय, की श्रेष्ठ लिखाण कोणतं? तर जे इतकं सहज आहे की अरेच्चा, हे आपल्याला का नाही सुचलं बुवा? असं वाटायला लागेल असं कोणतंही लिखाण.
अवचट वाचताना असंच क्षणोक्षणी जाणवत. 'जगणं' म्हणजे काय हे कळून घ्यायचं असेल तर अवचटांच कुठलही पुस्तक वाचावं. काही दिवसांपूर्वी माझ्या हातात त्यांच 'स्वतःविषयी' हे पुस्तक आल. ते झपाट्यानं वाचून काढलं. आणि त्यानंतर लगेचच त्यांचं 'सुनंदाला आठवताना' हेही मिळालं. खर तर सध्या परीक्षा, submissions आणि presentation यांची टांगती तलवार डोक्यावर आहे. तरीही काल 'सुनंदाला आठवताना' वाचायला सुरुवात केली आणि ते संपवूनच थांबले.
एक विलक्षण अनुभव होता तो. सहजीवन कसं असावं, याचा जणू काही आदर्शच. त्याचबरोबर भारावून जायला झालं ते सुनंदा अवचट यांच्याबद्दल जाणून घेतल्यामुळे. संपूर्ण लेख म्हणजे एक आरसा आहे, सुनंदा अवचट या व्यक्तिमत्त्वाचा. नकळत मन तुलना करू लागलं.त्यांचा शिस्तशीरपणा, नेटकेपणा, कामाचा उरक, सगळंच 'perfectionist ' या शिक्क्याला साजेसं. वाटत होतं, अरे, आपण यातलं निम्मं जरी उचलू शकलो तरी आपली किती प्रगती होईल.
वाढदिवसाचं present म्हणून आपल्यामधला एखादा दुर्गुण कमी करणे ही किती मोठी गोष्ट आहे! अवचट म्हणतात, नंतर नंतर एकमेकांमधल्या खटकणाऱ्या गोष्टीच संपल्या!! किती सहज म्हणून जातात ते हे. 'स्वतःविषयी' या पुस्तकात बऱ्याचदा असा उल्लेख आला आहे की, सुनंदा आणि अनिल यांच्या लग्नाला अवचटांच्या घरून विरोध होता.आणि या लेखात तर पदोपदी असा उल्लेख आला आहे की अवचटांचे आई-वडील आणि इतर नातेवाईक यांच्याशी सुनंदा अवचटांनी किती चांगले संबंध जोपासले होते.खरच एखादा माणूस आपल्या वागण्याने अशी सगळ्यांची मने जिंकून घेऊ शकतो?
त्यांच्या रुग्णांशी वागणुकीचे तर कितीतरी दाखले वाचताना जाणवतात. आपुलकी, जिव्हाळा, एखाद्याच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा केलेलं कौतुक समोरच्या माणसाला उभारी द्यायला पुरेसा पडतो हे त्यांनी जणूकाही सिद्धच केलं. मुक्तांगण बद्दल वाचताना तर थक्कच झाले. माणसांच्या मनातल ओळखण्याची जादू होती की काय त्यांच्याकडे? कसा जमत असेल ते सगळं?
सर्वात जास्त वाईट वाटले ते त्यांच्या कॅन्सर निदानाबद्दल वाचताना. इतका positive approch आयुष्याबद्दल माणसाजवळ असू शकतो? कसं काय? कॅन्सरच्या निदानानंतर त्या आठ वर्षे जगल्या. अवचट म्हणतात, 'ती आठ वर्षे ऐंशी वर्षांपेक्षा मोठी. आम्ही कधी नव्हतो, एव्हढे जवळ आलो, समरसून जगलो. या आजारानं वेळेची किंमत कळाली. '
पेशंटनीच डॉक्टरला धीर दिल्याचं कुणी कधी ऐकलय का? त्यांच्या बाबतीत तर अजबच, आपण स्वतः केमो साठी admit असताना दुसऱ्या पेशंटच counselling करणं त्याच जाणोत.
शेवटी काय, असलेल आयुष्य पूर्णपणे भरभरून जगणं यापेक्षा चांगलं काय? सुनंदा आणि अनिल अवचट यांच्याबद्दल वाचताना हेच जाणवत. प्रवीण दवणेंच्या भाषेत 'जगण्याचा सोहळा' साजरा करीत असलेली माणसे ही.. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? त्यांच्यासारखं भरभरून जगायला आवडेल हे मात्र खर..

Monday, April 5, 2010

nostalgia..

आज सहजच जुने फोटो बघत बसले होते. आणि अचानकच हाती आला एक अल्बम (सॉरी, फोल्डर!).
डिसेंबर '०९ च्या पहिल्या आठवड्यात एका आदिवासी शाळेत जायची संधी मिळाली होती.
ANCF म्हणजे Asian Natural conservation foundation यांच्यातर्फे एक उपक्रम राबवला जातो. बरेचसे स्वयंसेवक वेगवेगळ्या आदिवासी शाळेत जाऊन
वेगवेगळे विषय (बहुतेक करून शास्त्र निगडीत) शिकवतात. पर्यावरणशास्त्र हा त्यातला मुख्य भाग असतो.
कारण बहुधा या सगळ्या शाळा अगदी छोट्याशा खेडेगावातल्या आहेत. इथे येणारी जवळपास सगळी मुलं कुठल्या ना कुठल्या आदिवासी जमातीतली आहेत.
त्यामुळेच निसर्ग हा त्यांच्या आयुष्यातला बराच मोठा आणि महत्त्वाचा घटक आहे.

असेच त्या वेळी गीता field station वर आली होती. ती दोन दिवस तिकडे राहणार होती. २-३ शाळात जाऊन चित्रकला आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्याचं तिने ठरवलं होतं. त्यासाठी तिने बरीच बक्षिसे ही आणली होती मुलांना वाटण्यासाठी. वेळ होतं त्यामुळे मी तिला सहजच म्हटलं की मी आले तर चालेल का? मला खूप आवडेल या मध्ये सहभागी व्हायला. तिने लगेचच संमती दिली.

बोक्कापुरम ते उटी रस्त्यावर बोक्कापुरम पासून ३-४ kilometer वर मावनहल्ला म्हणून एक अतिशय छोटं आणि मस्त गाव आहे. तिकडे जायचं ठरलं होतं.
स्पर्धेसाठी मुख्यतः तीन गट केले होते. अगदी छोटे म्हणजे बालवाडी ते दुसरी, मध्यम म्हणजे तिसरी ते पाचवी-सहावी आणि मोठा म्हणजे नववी दहावीपर्यंत.
छोटा गट आणि मध्यम गटासाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली तर मोठ्या गटासाठी निबंध.

आम्ही गेलो तेव्हा तिथल्या शिक्षक शिक्षिका आपापल्या वर्गांवर शिकवत होते. आम्ही गेल्यावर मात्र आमच्यासाठी खास वेळ देण्यात आला.

ही शाळा मला अतिशय मनापासून आवडली. एक तर खूप वर्षांनी शाळेत पाऊल टाकत होते. त्यामुळे माझी शाळा, शाळेतले दिवस, बेंचेस, युनिफॉर्म वगैरे खूप आठवत होतं. जणूकाही मी स्वतःलाच त्या मुलांच्या ठिकाणी परत पाहत होते.
बालवाडी, पहिली दुसरी या तिन्ही वर्गांसाठी एकाच शिक्षिका होत्या. तीच गट जराशा मोठ्या चौथी पाचवीच्या वर्गांसाठी. कारण इथल्या विद्यार्थ्यांची संख्या तशी बरीच कमी आहे. जरी विध्यार्थ्याने नाव शाळेत घातले असले तरी तो शाळेत येईलच नियमितपणे याची खात्री अजिबात नाही. कारण मुळातच अभ्यासाची गरज त्यांना फारशी जाणवत नसावी. आम्ही गेलो तेव्हा तिथले एक शिक्षक एका विद्यार्थ्याची चौकशी दुसऱ्या मुलांकडे करत होते (अर्थातच तमिळ मधून!!) तो मुलगा बरेच दिवस शाळेत आला नसावा. ते शिक्षक ज्या तळमळीनं मुलांना शाळेत या म्हणून सांगत होते ते बघून खूप भरून आलं. खरच किती अवघड आहे अशी मुलं सांभाळणं..जरीही ते तमिळ मधून बोलत असले तरी त्यांना काय म्हणायचं आहे ते त्यांच्या आविर्भावावरून लगेचच कळत होतं. खरच खूप dedicated शिक्षकच हवेत अशा ठिकाणी.

आम्ही चित्रकला आणि निबंध स्पर्धा त्या मुलांना विषय देऊन सुरु केली. तसा विषय असा काहीच दिला नव्हता. चित्रकलेसाठी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला जे आवडेल, तुमच्या मनात जे चित्र असेल ते काढा. इथे एक खूप छान आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथे जेव्हढी मुले चित्र काढत होती त्यापैकी जवळपास सर्व..म्हणजे दोन तीन सोडल्यास, सर्व मुलांच्या चित्रांचे विषय निसर्गाशी संबंधित होते. म्हणजे अगदी हरीण, सांबर, हत्ती, मोर आणि पक्षी वगैरे सुद्धा या मुलांनी अतिशय सहजतेने आणि सुंदर काढले होते. मुळातच त्यांची निरीक्षणशक्ती किती जबरदस्त होती हे लगेचच कळून येत होतं. हरीण, सांबर किंवा मोर काढताना shape , size यांचा जे आकलन होतं ते खरोखर शब्दात नाही मांडू शकत मी इथे. त्याचवेळेला मला सकाळ मध्ये दर रविवारी बालवाचकांची जी चित्रे प्रसिद्ध होतात ती आठवली. नव्वद ते पंच्याण्णव टक्के विषय कार्टून किंवा animation किंवा तत्सम असतात. यावरून मी विचार करत होते की मुलांना जे अवतीभवती दिसत त्याप्रमाणे विचार करायची किंवा वागायची सवय लागते. निसर्गाच्या सानिध्याच महत्त्व मला खरच तिथे पटत होतं.

हे सगळं होत असताना आम्ही त्या सगळ्या वर्गातून फिरत होतो. पहिल्यांदा आम्ही वर्गात गेलो तेव्हा तिथल्या बाईंनी त्या मुलांना उभ राहायला लावून आम्हाला 'good morning madam' म्हणायला लावलं होतं. खूप awkward feel झालं तेव्हा. हे transition कधी झालं आणि मी 'madam' कधी झाले हे मलाही कळलं नाही. आणि नंतर जेव्हा जेव्हा मी त्या वर्गात चक्कर टाकली तेव्हा तेव्हा ती छोटी चिल्लीपिल्ली हातातल काम टाकून मला 'good morning madam ' म्हणत होती. त्यात मलाही मजा आली आणि बहुधा त्यानाही मजा वाटत असावी. मधल्या वेळेत मी त्यांची नावं विचारण्याचा प्रयत्न केला. आता ती नावं लक्षात नाहीत पण एकीचं नाव 'रोजा' होतं हे चांगलाच आठवत. (फिल्म effect होता की काय असा विचार माझ्या मनाला सहजच शिवून गेला!) निबंध स्पर्धाही बऱ्यापैकी चांगली झाली. काही मुलांनी भरभरून लिहिलं तर काहींनी अगदी जबरदस्ती केल्यासारखं चार ओळी खरडून दिल्या होत्या. तमिळ असल्यामुळे अर्थातच तिथेही काहीच scope नव्हता मला.. पण एकंदरीत हस्ताक्षर आणि नीटनेटकेपणा यावरून मी अंदाज बंधू शकत होते की कुणी बरा लिहिला असावा.

स्पर्धा सुरु असताना मी सहजच तिथल्या एका शिक्षकांशीही बोलले. त्यांनी सांगितला की त्या मुलांना जनरली एक शैक्षणिक वर्ष संपवायला दीड कॅलेंडर year लागतात. त्या शिक्षकांना इंग्रजी आणि तमिळ याशिवाय कुठलीच भाषा येत नव्हती. त्यामुळे मला माझी मातृभाषा म्हणजे मराठी आणि इंग्रजी सोडून हिंदी पण येत याच फार अप्रूप वाटत होतं. त्यांच्या विनंतीवरून मी त्यांचं नाव हिंदीत पण लिहून दाखवलं. कदाचित त्यांनी अजूनही तो त्यांचं नाव लिहिलेला चीठोरा जपून ठेवला असेल.

चित्रकलेचा निकाल लावणं खरोखर आम्हाला खूप अवघड गेलं. आम्ही तिथल्या मुख्याध्यापिकेला विनंती केली की तुम्ही आम्हाला निकाल ठरवण्यासाठी मदत करा. पण त्यांच्या मते त्यांना सगळी मुले माहित होती त्यामुळे त्यांनी लावलेला निकाल biased होऊ शकला असता. त्यानुळे त्यांनी नकार दिला. शेवटी मी, गीता आणि शक्ती अशा तिघांनी मिळून prize winners ठरवले.





बक्षीस समारंभ दुसऱ्या दिवशी असल्या कारणाने मी जाऊ शकले नाही. पण तो दिवस माझ्यासाठी खूप संस्मरणीय ठरला. मला तमिळ येत नाही याचा सगळ्यात जास्त वाईट त्या दिवशी मला तिथे वाटलं. कारण इतक्या छान छोट्या मुलांशी मी काही निवडक इंग्रजी शब्दांव्यतिरिक्त काहीच बोलू शकले नाही.

पण हा अनुभव एकंदरीतच इतका मस्त होता की मी पुन्हा तिथे जायचच असं ठरवूनच परत आले. आता बघूयात परत केव्हा संधी मिळते ते!!